शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

रजनीकांत, कमल हसन यशस्वी राजकारणी बनतील असे वाटत नाही - मणीशंकर अय्यर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 17:51 IST

राजकारणात उतरलेले तामिळ सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन जनमानसाची पकड घेणारे प्रभावी राजकारणी बनतील असे वाटत नाही.

ठळक मुद्देरजनीकांत एक चांगला माणूस आहे अशा चांगल्या माणसांची आज राजकारणात आवश्यकता आहे. दक्षिणेतील यशस्वी अभिनेते शिवाजी गणेशन, कॅप्टन विजयकांथ राजकारणात कसे अपयशी ठरले त्याची त्यांनी उदहारणे दिली.

नवी दिल्ली - राजकारणात उतरलेले तामिळ सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन जनमानसाची पकड घेणारे प्रभावी राजकारणी बनतील  असे वाटत नाही असे मत काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या मणी शंकर अय्यर यांनी व्यक्त केले. इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. रजनीकांत यांच्या राजकारणात उतरण्याचे सर्वांनीच स्वागत केले आहे. 

रजनीकांत एक चांगला माणूस आहे अशा चांगल्या माणसांची आज राजकारणात आवश्यकता आहे. पण चांगली माणस देशाची पंतप्रधान होतील अशी अपेक्षा करण म्हणजे मणीशंकर अय्यरने देशाच्या पंतप्रधानपदाच स्वप्न पाहण्यासारख आहे. असं घडू शकत नाही असे अय्यर म्हणाले. एमजीआर आणि जयललिता द्रविडीयन चळवळीशी संबंधित होते. त्यांनी त्यांच्या सिनेक्षेत्राच्या प्रभावाचा राजकारणात पुरेपूर वापर केला त्यामुळे ते राजकारणात यशस्वी ठरले असे अय्यर म्हणाले. 

दक्षिणेतील यशस्वी अभिनेते शिवाजी गणेशन, कॅप्टन विजयकांथ राजकारणात कसे अपयशी ठरले त्याची त्यांनी उदहारणे दिली. सिनेमामध्ये त्यांची कारकीर्द यशस्वी होती पण तेच यश त्यांना राजकारणात लाभले नाही. रजनीकांत तामिळनाडूमध्ये काँग्रेसला हरवतील पण अन्य पक्षांना पराभूत करणे त्यांना जमणार नाही असे मणीशंकर अय्यर म्हणाले.  

गुजरात निवडणुकीच्यावेळी मणीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नीच माणूस म्हटले होते. मोदी नीच आणि असभ्य माणूस आहे अशी विधाने त्यांनी केली होती. गुजरात निवडणुकीत त्यांच्या या विधानाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने लगेचच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. याआधी मणिशंकर अय्यर यांनी 2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींना 'चायवाला' म्हटलं होतं.                           

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणिशंकर अय्यरKamal Hassanकमल हासन