राजेंद्र मिरगणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे वैराग तालुका निर्मितीसह सानुग्रह अनुदान मिळावे

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:33+5:302015-09-07T23:27:33+5:30

बार्शी : तीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वैराग तालुक्याची निर्मिती करावी, बार्शी तालुक्याची शासनाकडे रब्बी तालुका म्हणून नोंद असली तरी रब्बीचा हंगाम हा खरिपातील पिकांवरच अवलंबून असतो पण गेल्या अनेक वर्षांपासून पावसाअभावी खरिपाची पेरणी होत नाही. त्यामुळे शासनाने रब्बी नोंद रद्द करून हा तालुका खरीप तालुका नोंद करून खरिपाच्या नुकसान भरपाईसाठी सानुग्रह अनुदान मिळावे, तालुक्यात चारा छावण्या चालू कराव्यात आदी मागण्या जिल्हा महासंपर्क अभियान प्रमुख राजेंद्र मिरगणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

Rajendra Mirgane's Chief Minister should get ex-gratia grant with the creation of Saarc Vairag Taluka | राजेंद्र मिरगणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे वैराग तालुका निर्मितीसह सानुग्रह अनुदान मिळावे

राजेंद्र मिरगणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे वैराग तालुका निर्मितीसह सानुग्रह अनुदान मिळावे

र्शी : तीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वैराग तालुक्याची निर्मिती करावी, बार्शी तालुक्याची शासनाकडे रब्बी तालुका म्हणून नोंद असली तरी रब्बीचा हंगाम हा खरिपातील पिकांवरच अवलंबून असतो पण गेल्या अनेक वर्षांपासून पावसाअभावी खरिपाची पेरणी होत नाही. त्यामुळे शासनाने रब्बी नोंद रद्द करून हा तालुका खरीप तालुका नोंद करून खरिपाच्या नुकसान भरपाईसाठी सानुग्रह अनुदान मिळावे, तालुक्यात चारा छावण्या चालू कराव्यात आदी मागण्या जिल्हा महासंपर्क अभियान प्रमुख राजेंद्र मिरगणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
सोलापूर जिल्?ाच्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सोलापूर येथे आले असता राजेंद्र मिरगणे यांनी शिष्टमंडळासमवेत निवेदन देताच मुख्यमंत्र्यांनी याबाबत राज्यातील इतर तालुक्यांच्या निर्मितीबरोबरच अग्रक्रमाने वैराग तालुक्याचा समावेश करू, तसेच खरीप पिकाच्या नुकसानभरपाईचा अहवाल मागवून घेऊ, असे आश्वासन देऊन व इतर मागण्यांबाबत गांभीर्याने दखल घेण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना आदेश देण्यात आले आहेत.
मिरगणे यांनी या मागण्यांबरोबरच तालुक्यातील उपलब्ध पाण्याचा साठा संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत केलेल्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी दुजोरा देऊन खासगी विहिरी अधिग्रहण व बोअर ताब्यात घेऊन पाणीपुरवठा करावा, असे सांगितले.
यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष धनू जाधव, मधुकर जगदाळे, छोटूभाऊ लोहे, बिभीषण पाटील, रामराजे पवार यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Rajendra Mirgane's Chief Minister should get ex-gratia grant with the creation of Saarc Vairag Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.