शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आयटी क्षेत्रात राजस्थानची अभूतपूर्व प्रगती; मुख्य सचिव उषा शर्मा यांचे गौरवोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 09:16 IST

आयटी क्षेत्रात राजस्थान अभूतपूर्व प्रगती करत असल्याचे राज्याच्या मुख्य सचिव उषा शर्मा यांनी स्पष्ट केले.

जयपूर: आयटी क्षेत्रात राजस्थान अभूतपूर्व प्रगती करत असल्याचे राज्याच्या मुख्य सचिव उषा शर्मा यांनी स्पष्ट केले. राजीव गांधी सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांची उपस्थिती होती. 

कार्यक्रमास माहिती व तंत्रज्ञान विभागाचे आयुक्त व आरकॅटचे एमडी आशिष गुप्ता यांची उपस्थिती होती. यावेळी आरकॅट आणि वनस्थली विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यानुसार, आरकॅट विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रगत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणार आहे. 

मुख्य सचिव उषा शर्मा म्हणाल्या की, महिलांनी त्यांची शक्ती आणि महत्त्व जाणले पाहिजे. शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, आयटी आदी क्षेत्रांत राज्याने मोठी प्रगती केली आहे. भविष्यातील ३०-४० वर्षांचा विचार करून राज्य सरकार काम करत आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे आयुक्त व आरकॅटचे एमडी आशिष गुप्ता म्हणाले की, ही भारतातील एकमेव संस्था आहे, जी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य क्षमता निर्माण करून त्यांना रोजगार मिळवून देते. आरकॅटच्या कार्यकारी संचालिका ज्योती लुहाडिया म्हणाल्या की, महिलांचा तंत्रज्ञानातील सहभाग वाढविण्यासाठी त्यांना योग्य संधी दिली पाहिजे. कार्यक्रमास प्रा. इना शास्त्री, डॉ. जयश्री पेरीवाल, अर्चना सुराणा, अलका बत्रा, अंजू सिंग आणि नीलम मित्तल यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rajasthanराजस्थान