शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

ह्दयद्रावक! प्यायला पाणी न मिळाल्यानं ६ वर्षाच्या मुलीचा दुदैवी अंत; रखरखत्या उन्हात २५ किमी पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 12:58 IST

राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील रानीवाडा येथील परिसरात रविवारी एका मुलीचा मृत्यू झाला आहे. ४५ डीग्री तापमानात ही मुलगी तिच्या आजीसोबत प्रवास करत होती.

ठळक मुद्देपोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वृद्ध आजीला पाणी पाजलं आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.मुलीच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम केले असता पाणी न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं कारण उघड झालं.कोरोना काळात वाहनांची ये-जा कमी असल्याने तिला घरी येण्यासाठी कोणतंही साधन मिळालं नाही

जालौर – सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत जगातील विकसित देशांसोबत स्पर्धेत आहे. आधुनिक आणि आत्मनिर्भर भारत असा दावा करताना दुसरीकडे काही अशा घटना समोर येतात ज्यांनी शरमेने मान खाली जाते. राजस्थानच्या जालौर जिल्ह्यात अशीच दुर्दैवी घटना घडली आहे. जिथं रखरखत्या उन्हात प्रवास करणाऱ्या ६ वर्षीय मुलीचा पाणी न मिळाल्यानं मृत्यू झाला आहे. मुलगी तिच्या आजीसोबत होती. आजीही बेशुद्ध पडली.

राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील रानीवाडा येथील परिसरात रविवारी एका मुलीचा मृत्यू झाला आहे. ४५ डीग्री तापमानात ही मुलगी तिच्या आजीसोबत प्रवास करत होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वृद्ध आजीला पाणी पाजलं आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तर चिमुकलीचा मृतदेह हॉस्पिटलला पाठवण्यात आला. त्याठिकाणी पोस्टमोर्टम केले असता पाणी न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं कारण उघड झालं.

पायपीट करून प्रवास का करत होते?

माहितीनुसार, ६० वर्षीय सुखी देवी तिची नात अंजलीसह सिरोहीजवळील रायपूरहून दुपारी रानीवाडा परिसरातील डुंगरी येथे तिच्या घरी येत होती. कोरोना काळात वाहनांची ये-जा कमी असल्याने तिला घरी येण्यासाठी कोणतंही साधन मिळालं नाही. त्यामुळे आजी नातीला घेऊन चालतच तिच्या गावाच्या दिशेने निघाली. जवळपास २०-२५ किमी चालल्यानंतर दोघांची अवस्था बिकट झाली. त्यांना थकवा आला. वाळवंटाच्या क्षेत्रात त्या दोघींना तहान लागली होती. पाणी न मिळाल्याने रोडा गावाजवळ अंजलीचा मृत्यू झाला. तर सुखी देवी बेशुद्ध होऊन खाली कोसळल्या. कोरोना काळ आणि गरमीचे दिवस असल्याने खूप वेळ याठिकाणाहून कोणी आलं-गेलं नाही. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी कोणीच येऊ शकलं नाही. पोस्टमोर्टमनंतर मुलीचा मृतदेह दफन करण्यात आला.

केंद्रीय मंत्र्याचा काँग्रेसवर निशाणा

पिण्याचं पाणी न मिळाल्याने एका मुलीचा मृत्यू झाला आहे परंतु आता या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून काँग्रेस सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ९ तास पिण्याचं पाणी न मिळाल्याने एका मुलीचा मृत्यू झाला आहे. हे लज्जास्पद आहे. राजस्थान सरकार यासाठी जबाबदार आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आता गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Policeपोलिस