शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

ह्दयद्रावक! प्यायला पाणी न मिळाल्यानं ६ वर्षाच्या मुलीचा दुदैवी अंत; रखरखत्या उन्हात २५ किमी पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 12:58 IST

राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील रानीवाडा येथील परिसरात रविवारी एका मुलीचा मृत्यू झाला आहे. ४५ डीग्री तापमानात ही मुलगी तिच्या आजीसोबत प्रवास करत होती.

ठळक मुद्देपोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वृद्ध आजीला पाणी पाजलं आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.मुलीच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम केले असता पाणी न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं कारण उघड झालं.कोरोना काळात वाहनांची ये-जा कमी असल्याने तिला घरी येण्यासाठी कोणतंही साधन मिळालं नाही

जालौर – सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत जगातील विकसित देशांसोबत स्पर्धेत आहे. आधुनिक आणि आत्मनिर्भर भारत असा दावा करताना दुसरीकडे काही अशा घटना समोर येतात ज्यांनी शरमेने मान खाली जाते. राजस्थानच्या जालौर जिल्ह्यात अशीच दुर्दैवी घटना घडली आहे. जिथं रखरखत्या उन्हात प्रवास करणाऱ्या ६ वर्षीय मुलीचा पाणी न मिळाल्यानं मृत्यू झाला आहे. मुलगी तिच्या आजीसोबत होती. आजीही बेशुद्ध पडली.

राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील रानीवाडा येथील परिसरात रविवारी एका मुलीचा मृत्यू झाला आहे. ४५ डीग्री तापमानात ही मुलगी तिच्या आजीसोबत प्रवास करत होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वृद्ध आजीला पाणी पाजलं आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तर चिमुकलीचा मृतदेह हॉस्पिटलला पाठवण्यात आला. त्याठिकाणी पोस्टमोर्टम केले असता पाणी न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं कारण उघड झालं.

पायपीट करून प्रवास का करत होते?

माहितीनुसार, ६० वर्षीय सुखी देवी तिची नात अंजलीसह सिरोहीजवळील रायपूरहून दुपारी रानीवाडा परिसरातील डुंगरी येथे तिच्या घरी येत होती. कोरोना काळात वाहनांची ये-जा कमी असल्याने तिला घरी येण्यासाठी कोणतंही साधन मिळालं नाही. त्यामुळे आजी नातीला घेऊन चालतच तिच्या गावाच्या दिशेने निघाली. जवळपास २०-२५ किमी चालल्यानंतर दोघांची अवस्था बिकट झाली. त्यांना थकवा आला. वाळवंटाच्या क्षेत्रात त्या दोघींना तहान लागली होती. पाणी न मिळाल्याने रोडा गावाजवळ अंजलीचा मृत्यू झाला. तर सुखी देवी बेशुद्ध होऊन खाली कोसळल्या. कोरोना काळ आणि गरमीचे दिवस असल्याने खूप वेळ याठिकाणाहून कोणी आलं-गेलं नाही. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी कोणीच येऊ शकलं नाही. पोस्टमोर्टमनंतर मुलीचा मृतदेह दफन करण्यात आला.

केंद्रीय मंत्र्याचा काँग्रेसवर निशाणा

पिण्याचं पाणी न मिळाल्याने एका मुलीचा मृत्यू झाला आहे परंतु आता या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून काँग्रेस सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ९ तास पिण्याचं पाणी न मिळाल्याने एका मुलीचा मृत्यू झाला आहे. हे लज्जास्पद आहे. राजस्थान सरकार यासाठी जबाबदार आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आता गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Policeपोलिस