शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ह्दयद्रावक! प्यायला पाणी न मिळाल्यानं ६ वर्षाच्या मुलीचा दुदैवी अंत; रखरखत्या उन्हात २५ किमी पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 12:58 IST

राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील रानीवाडा येथील परिसरात रविवारी एका मुलीचा मृत्यू झाला आहे. ४५ डीग्री तापमानात ही मुलगी तिच्या आजीसोबत प्रवास करत होती.

ठळक मुद्देपोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वृद्ध आजीला पाणी पाजलं आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.मुलीच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम केले असता पाणी न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं कारण उघड झालं.कोरोना काळात वाहनांची ये-जा कमी असल्याने तिला घरी येण्यासाठी कोणतंही साधन मिळालं नाही

जालौर – सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत जगातील विकसित देशांसोबत स्पर्धेत आहे. आधुनिक आणि आत्मनिर्भर भारत असा दावा करताना दुसरीकडे काही अशा घटना समोर येतात ज्यांनी शरमेने मान खाली जाते. राजस्थानच्या जालौर जिल्ह्यात अशीच दुर्दैवी घटना घडली आहे. जिथं रखरखत्या उन्हात प्रवास करणाऱ्या ६ वर्षीय मुलीचा पाणी न मिळाल्यानं मृत्यू झाला आहे. मुलगी तिच्या आजीसोबत होती. आजीही बेशुद्ध पडली.

राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील रानीवाडा येथील परिसरात रविवारी एका मुलीचा मृत्यू झाला आहे. ४५ डीग्री तापमानात ही मुलगी तिच्या आजीसोबत प्रवास करत होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वृद्ध आजीला पाणी पाजलं आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तर चिमुकलीचा मृतदेह हॉस्पिटलला पाठवण्यात आला. त्याठिकाणी पोस्टमोर्टम केले असता पाणी न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं कारण उघड झालं.

पायपीट करून प्रवास का करत होते?

माहितीनुसार, ६० वर्षीय सुखी देवी तिची नात अंजलीसह सिरोहीजवळील रायपूरहून दुपारी रानीवाडा परिसरातील डुंगरी येथे तिच्या घरी येत होती. कोरोना काळात वाहनांची ये-जा कमी असल्याने तिला घरी येण्यासाठी कोणतंही साधन मिळालं नाही. त्यामुळे आजी नातीला घेऊन चालतच तिच्या गावाच्या दिशेने निघाली. जवळपास २०-२५ किमी चालल्यानंतर दोघांची अवस्था बिकट झाली. त्यांना थकवा आला. वाळवंटाच्या क्षेत्रात त्या दोघींना तहान लागली होती. पाणी न मिळाल्याने रोडा गावाजवळ अंजलीचा मृत्यू झाला. तर सुखी देवी बेशुद्ध होऊन खाली कोसळल्या. कोरोना काळ आणि गरमीचे दिवस असल्याने खूप वेळ याठिकाणाहून कोणी आलं-गेलं नाही. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी कोणीच येऊ शकलं नाही. पोस्टमोर्टमनंतर मुलीचा मृतदेह दफन करण्यात आला.

केंद्रीय मंत्र्याचा काँग्रेसवर निशाणा

पिण्याचं पाणी न मिळाल्याने एका मुलीचा मृत्यू झाला आहे परंतु आता या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून काँग्रेस सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ९ तास पिण्याचं पाणी न मिळाल्याने एका मुलीचा मृत्यू झाला आहे. हे लज्जास्पद आहे. राजस्थान सरकार यासाठी जबाबदार आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आता गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Policeपोलिस