शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

राजस्थानातील अर्भक मृत्यूची हायकोर्टाने घेतली स्वत:हून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 06:16 IST

राजस्थानमधील सरकारी रुग्णालयांत अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची राजस्थान उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली

जयपूर : राजस्थानमधील सरकारी रुग्णालयांत अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची राजस्थान उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली असून, याप्रकरणी राज्य सरकारने आपले म्हणणे आणि सर्व माहिती न्यायालयाला सादर करावी, असे आदेश दिले आहेत. कोटा रुग्णालयातील अर्भकांच्या मृत्यूचे प्रकरण अगदी अलीकडचे आहे. त्या प्रकाराने केवळ राजस्थानातच नव्हे, तर संपूर्ण देशात खळबळ माजली. केंद्र सरकारने या प्रकरणाची माहिती राज्य सरकारकडून मागवून घेतली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोटा रुग्णालयात केंद्रीय पथकही पाहणीसाठी पाठविले होते. हे पथक येणार असल्याचे कळताच राजस्थान सरकार जागे झाले. लगेचच राज्याचे आरोग्यमंत्री आणि नंतर उपमुख्यमंत्री सचिन पायलट हेही कोटा रुग्णालयात गेले. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून अर्भकांच्या मृत्यूची माहिती मागवून घेतली. तसेच असे प्रकार अजिबात होता कामा नयेत, असेही मुख्यमंत्र्यांना सांगितले. भाजपने तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली. बसपाप्रमुख मायावती यांनीही गेहलोत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. बसपाचे ६ आमदार काँग्रेसमध्ये गेल्याने त्या संतापल्या आहेत.>कुठे किती मृत्यू?राजस्थानच्या बिकानेर येथील रुग्णालयात १६२ अर्भके आतापर्यंत मरण पावली असून, जोधपूरच्या सरकारी रुग्णालयात १४६ अर्भकांचा मृत्यू झाला आहे. कोटा येथील सरकारी रुग्णालयातील अर्भकांच्या मृत्यूची संख्या ११० आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेबु्रवारी रोजी होणार आहे.