शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

‘राजस्थानातील सरकार कोसळू शकते’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 04:33 IST

कर्नाटक आणि गोव्यातील घटनेची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होत असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे.

जयपूर : कर्नाटक आणि गोव्यातील घटनेची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होत असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे. राजस्थानातील सरकार कोसळू शकते, असाही दावा भाजपचे आमदार वासुदेव देवनानी यांनी केला आहे.विधानसभा परिसरात मीडियाशी बोलताना आमदार वासुदेव देवनानी म्हणाले की, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे आमदार धास्तावलेले आहेत. मुख्यमंत्री गेहलोत यांना असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे ते असे विधान करत आहेत की, राज्यातील लोक त्यांनाच मुख्यमंत्रीपदी ठेवू इच्छितात. जर गावागावातील लोकांची अशी इच्छा आहे, तर ते त्यांना स्वत:च्या बूथवर पराभव का स्वीकारावा लागला?आमदार वासुदेव देवनानी म्हणाले की, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेहलोत यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा होती. मात्र, गेहलोत यांनी स्पष्ट केले की ते जाण्यासाठी अनिच्छुक आहेत.भाजपचे आमदार अशोक लाहोटी म्हणाले की, गेहलोत यांनी १० जुलै रोजी सादर केलेले बजेट हे शेवटचे असेल. गेहलोत काही दिवसांत दिल्लीला रवाना होतील. दोन महिन्यात राजस्थानात राजकीय अस्थिरता निर्माण होईल.भाजपचे आमदार कालिचरण सराफ म्हणाले की, राजस्थानात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. गेहलोत आणि पायलट यांच्यातील अंतर्गत वादामुळे सरकार धोक्यात आहे आणि ते कधीही कोसळूशकते.>‘आमचे आमदार धोका देणार नाहीत’राज्यातील गेहलोत यांच्या सरकारला कोणताही धोका नाही, असे मंत्री बी.डी. कल्ला यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, भाजप एकीकडे नैतिकतेच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करतो. काँग्रेसचे आमदार प्रशांत बैरवा म्हणाले की, काँग्रेसचे आमदार पक्षाला धोका देणार नाहीत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेस