शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

‘राजस्थानातील सरकार कोसळू शकते’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 04:33 IST

कर्नाटक आणि गोव्यातील घटनेची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होत असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे.

जयपूर : कर्नाटक आणि गोव्यातील घटनेची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होत असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे. राजस्थानातील सरकार कोसळू शकते, असाही दावा भाजपचे आमदार वासुदेव देवनानी यांनी केला आहे.विधानसभा परिसरात मीडियाशी बोलताना आमदार वासुदेव देवनानी म्हणाले की, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे आमदार धास्तावलेले आहेत. मुख्यमंत्री गेहलोत यांना असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे ते असे विधान करत आहेत की, राज्यातील लोक त्यांनाच मुख्यमंत्रीपदी ठेवू इच्छितात. जर गावागावातील लोकांची अशी इच्छा आहे, तर ते त्यांना स्वत:च्या बूथवर पराभव का स्वीकारावा लागला?आमदार वासुदेव देवनानी म्हणाले की, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेहलोत यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा होती. मात्र, गेहलोत यांनी स्पष्ट केले की ते जाण्यासाठी अनिच्छुक आहेत.भाजपचे आमदार अशोक लाहोटी म्हणाले की, गेहलोत यांनी १० जुलै रोजी सादर केलेले बजेट हे शेवटचे असेल. गेहलोत काही दिवसांत दिल्लीला रवाना होतील. दोन महिन्यात राजस्थानात राजकीय अस्थिरता निर्माण होईल.भाजपचे आमदार कालिचरण सराफ म्हणाले की, राजस्थानात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. गेहलोत आणि पायलट यांच्यातील अंतर्गत वादामुळे सरकार धोक्यात आहे आणि ते कधीही कोसळूशकते.>‘आमचे आमदार धोका देणार नाहीत’राज्यातील गेहलोत यांच्या सरकारला कोणताही धोका नाही, असे मंत्री बी.डी. कल्ला यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, भाजप एकीकडे नैतिकतेच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करतो. काँग्रेसचे आमदार प्रशांत बैरवा म्हणाले की, काँग्रेसचे आमदार पक्षाला धोका देणार नाहीत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेस