शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राजस्थानचं मंत्रिमंडळ 'हुश्शार'... या १२ जणांचं शिक्षण पाहून चकित व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 12:03 IST

राजस्थान सरकारमध्येही उच्चशिक्षित मंत्र्यांची कमतरता नाही. तेलंगणाप्रमाणेच येथील विधानसभेतही पीएचडी पदवीधारक, वकिल अन् इंजिनिअर आमदारांचा समावेश आहे.

जयपूर - राजस्थान सरकारच्या मंत्रिमंडळाचा सोमवारी शपथविधी सोहळा पार पडला. येथील अशोक गेहलोत सरकारच्या मंत्रिमंडळात 10 वी पास ते पीएचडी प्राप्त आमदारांचा भरणा आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात अर्धा डझन वकिलांचा समावेश आहे. तर एका बेसबॉलच्या राष्ट्रीय खेळाडूलाही स्थान मिळाले आहे. मात्र, याच मंत्रिमंडळातील 8 मंत्र्यांविरुद्ध पोलिसात गुन्हेही दाखल आहेत. 

राजस्थान सरकारमध्येही उच्चशिक्षित मंत्र्यांची कमतरता नाही. तेलंगणाप्रमाणेच येथील विधानसभेतही पीएचडी पदवीधारक, वकिल अन् इंजिनिअर आमदारांचा समावेश आहे. गेहलोत यांच्या 23 आमदारांच्या मंत्रिमंडळातील 8 जणांविरुद्ध पोलिस स्थानकात गुन्हे दाखल आहेत. त्यांमध्ये रमेश चंद्र मीना हे एकमेव इंजिनिअर पदवीधारक आहेत. तर गेहलोत यांच्या मंत्रिमंडळात बीडी कल्ला, रघु शर्मा आणि आरएलडी सुभाष गर्ग हे पीएचडी पदवीधारक आहेत. या तीनही आमदारांनी नुकतीच राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. कल्ला आणि रघु शर्मा यांनी एलएलबीचेही शिक्षण पूर्ण केलं आहे. तर शांतीकुमार धारीवाल, गोविंद सिंग दोतासरा, सुखराम बिश्णोई आणि तिकाराम जुली हेही एलएलबी पदवीधारक आहेत. तसेच, रघु शर्मा आणि ममता भुपेश हे दोन एमबीए पदवीधारक मंत्री असून ममता भुपेश एकमेव महिला मंत्री आहेत. 

गेहलोत यांच्या मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांचे शिक्षण हे बारावी किंवा तत्सम कोर्स पूर्ण केलेले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्वत: पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानministerमंत्रीMLAआमदार