शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

Anjali Kanwar Marriage: बापच तो! मुलीने भर मंडपात 'हुंडा' मागितला; त्याने ब्लँक चेक सही करून हातात ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 14:17 IST

Anjali Kanwar gave dowry to build Women Hostel: अंजली कंवर या तरुणीचे लग्न होते. तिने आपल्या वडिलांच्या हातात एक पत्र ठेवले. त्यामध्ये जे लिहिले होते, ते ऐकूण उपस्थित वरातींनाही टाळ्या वाजवाव्या लागल्या.

राजस्थानच्या बाडमेरमध्ये एका लग्न समारंभात अनोखा प्रकार घडला आहे. जेव्हा वरात आली तेव्हा लग्नाचे सर्व विधी पार पडले. परंतू नंतर असे काही घडले की ज्याची कोणीच कल्पना केली नसेल. निरोप देताना नवरीने असे काम केले की ती अनेकांसाठी एक आदर्श बनली आहे. 

अंजली कंवर या तरुणीचे लग्न होते. तिने आपल्या वडिलांच्या हातात एक पत्र ठेवले. त्यामध्ये जे लिहिले होते, ते ऐकूण उपस्थित वरातींनाही टाळ्या वाजवाव्या लागल्या. अंजलीने तिच्या बापाकडे हुंडा मागितला होता. तुम्ही म्हणाल यात टाळ्या वाजवण्यासारखे किंवा आदर्श घेण्यासारखे काय आहे, हुंडा मागितला म्हणजे गुन्हाच केला. पण तो कशासाठी मागितला हे कारण वाचाल तर तुम्हीही तिच्यासाठी टाळ्या वाजवाल. 

अंजलीने म्हटले की बापाने लग्नात दिलेला हुंडा तिला तिच्यासोबत सासरी न्यायचा नाहीय. त्या ऐवजी मुलींच्या हॉस्टेलचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करायचे आहे. लाडक्या मुलीची इच्छा पाहून बापाने लगेचच चेकबुक मागविले. किशोर सिंह कानोड यांनी मुलीच्या हातात ब्लँक चेक सही करून दिला व म्हणाले तुम्हा भरायची तेवढी रक्कम भर. अंजलीने गर्ल्स हॉस्टेल बनविण्यासाठी 75 लाख रुपये घेतले. 

यावर अंजलीने सांगितले की, ती ज्या समाजातून येते तिथे मुलींच्या शिक्षणाबाबत लोकांचे विचार अद्याप बदललेले नाहीत. अंजली देखील जेव्हा शिक्षणासाठी गेली होती, तेव्हा तिच्या वडिलांना लोकांचे खूप ऐकावे लागले होते. यामुळे तिला जसे शिक्षण मिळाले तसेच समाजाच्या इतर मुलींना मिळावे म्हणून तिने हे पैसे घेतले. अंजलीच्या वडिलांनी राजपूत हॉस्टेल परिसात मुलींसाठी हॉस्टेल बांधण्याच्या कामासाठी आधीच एक कोटी रुपये दिले आहेत. आता आणखी 75 लाख रुपये देऊन अर्धवट राहिलेले काम अंजली पूर्ण करणार आहे.

अंजलीच्या सासरच्यांनी आमच्या घरी लक्ष्मी आल्याने आम्ही नशीबवान समजतो. आमच्या समाजाचे लोक लग्नसमारंभांवर लाखो, करोडो रुपये उधळतात. त्याचा योग्य वापर केला जाऊ शकतो, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान