शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

सभागृहात रणकंदन, राजस्थानमध्ये विधानसभा अध्यक्ष सभागृहातच ढसाढसा रडले, नेमकं घडलं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:06 IST

Rajasthan Assembly News: राजस्थान विधानसभेमध्ये मागच्या काही दिवसांपासून सातत्याने गदारोळ सुरू असून, या गोंधळादरम्यान, मंगळवारी विधानसभेचं कामकाज सुरू असतानाच अध्यक्ष वासुदेव देवनानी हे सभागृहातच ढसाढसा रडू लागले.

राजस्थान विधानसभेमध्ये मागच्या काही दिवसांपासून सातत्याने गदारोळ सुरू असून, या गोंधळादरम्यान, मंगळवारी विधानसभेचं कामकाज सुरू असतानाच अध्यक्ष वासुदेव देवनानी हे सभागृहातच ढसाढसा रडू लागले. त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्यावर अपशब्द बोलल्याचा आणि अपमानित केल्याचा आरोप केला. तसेच मी आमदार बनण्याच्या पात्रतेचा नाही, असं मला वाटतं, असेही त्यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्षांच्या या भावूक प्रतिक्रियेनंतर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी स्वत: वासुदेव देवनानी यांच्या कक्षामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली.

राजस्थान विधानसभेमधून काँग्रेसच्या सहा आमदारांचं निलंबन करण्यात आल्यानंतर सभागृहामध्ये मंगळवारी चर्चा करण्यात आली. सभागृहाच्या कामकाजादरम्यान, विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी म्हणाले की, भारतामध्ये लोकशाही व्यवस्था आहे.  १९५२ पासून आजपर्यंत अशी घटना घडलेली नाही. मी सुद्धा पाच वेळा सदस्य म्हणून सभागृहात आलो आहे. मी कधीही असे शब्द ऐकलेले नाहीत. मी कधीही पक्षपात केलेला नाही. तरीही असे आरोप झाल्यावर वाईट वाटतं.  एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी जी काही विधानं केली आहेत. त्यामुळे सभागृहाची गरिमा  उद्ध्वस्त झाली आहे.

दरम्यान, आज सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर गोविंद सिंह डोटासरा म्हणाले होते की, हा माफी मागायला लावू इच्छित आहे. याच्या बापाची जहागीर नाही आहे. माफी मागायची झाली तर माझी चप्पल माफी मागेल. हा माणूस माफी मागण्याच्या लायक नाही आहे. कक्षामध्ये आश्वासन दिलं आणि आता सभागृह चालवत आहे. नियम २९५ शिकवत आहे. आताच याला २९५ शिकवतो.

त्यानंतर डोटासरा यांनी काँग्रेच्या महिला आमदारांकडे कटाक्ष करत सांगितले की, आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत. बांगड्या भरणाऱ्या तर या आहेत. त्यानंतर ते विधानसभा अध्यक्षांना उद्देशून ते म्हणाले होते की, तू कायमचा निघून जा. जो मान देण्याच्या लायकीचा नाही, त्याच्याशी चपलांची भाषा बोलली जाते. आम्ही याला खुर्चीवर बसू देणार नाही, डोसरा यांच्या या बोचऱ्या विधानांमुळे विधानसभा अध्यक्ष भावूक झाले. तसेच त्यांना नंतर अश्रू आवरणे कठीण झाले.

टॅग्स :Rajasthanराजस्थानvidhan sabhaविधानसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस