शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Rajasthan Assembly Election Results : राजस्थानात कोमेजलं कमळ; जनतेनं केलं काँग्रेसला जवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 15:13 IST

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रसने बहुमताकडे वाटचाल केली आहे. दुपारी १.३० पर्यंत काँग्रेसने ९६ जागांवर आघाडी घेतली आहे, तर भाजपाचा रथ ८० जागांवर थांबलेला दिसून आला.

सुहास शेलार

जयपूर - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रसने बहुमताकडे वाटचाल केली आहे. दुपारी १.३० पर्यंत काँग्रेसने ९६ जागांवर आघाडी घेतली आहे, तर भाजपाचा रथ ८० जागांवर थांबलेला दिसून आला. बसपा ३, तर अपक्ष २० जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी चालून आली आहे. शिवाय गेल्या पंचवीस वर्षांपासूनची सत्ताबदलाची परंपरा राजस्थानी जनतेने कायम राखली आहे.

बेरोजगारी, आरक्षण, कर्जमाफी या मुद्द्यांवरून राजस्थानातील सर्वसामान्य जनता विद्यमान वसुंधरा राजे सरकारवर नाराज आहे. याचा परिणाम थेट मतदानावर दिसून आला. शिवाय वसुंधरा राजे यांच्या एकछत्री कारभाराला कंटाळून पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी केलेली बंडखोरी भोवल्यामुळेच भाजपावर पराभवाची नामुष्की ओढवली आली आहे. भाजपाने यंदा ८० हून अधिक विद्यमान आमदार आणि ४ माजी मंत्र्यांना तिकिट नाकारले. त्यामुळे ऐनवेळी त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मतांचे ध्रुवीकरण झाले. आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला.

राजकीय विश्लेषक सांगतात, वसुंधरा राजे यांच्या संमती शिवाय राजस्थानच्या मंत्रिमंडळातून एकही फाईल पुढे सरकत नव्हती. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना मोठ्या प्रमाणात खीळ बसली होती. साहजिकच याचा फटका भाजपाच्या आमदारांना बसत होता. त्यामुळे स्वपक्षीय आमदारच राजे यांच्या कारभारावर नाराज होते. शिवाय २०१३ च्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात वसुंधरा राजे यांना मोठ्या प्रमाणात अपयश आले. रोजगार, आधुनिक शिक्षणाच्या सुविधा पुरवण्यात असमर्थ ठरल्यामुळे राजस्थानच्या गल्ली गल्लीत नवयुवक ‘मोदी तुझसे बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं’ अशा घोषणा देत होते. याचाही परिणाम मतदानावर झालेला दिसून आला.

भाजपाने यंदाच्या निवडणुकीत राजस्थानात विकासाच्या मुद्द्याला बगल देत हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतला. उमेदवारी यादीतूनही हिंदुत्त्वाचीच झलक दिसून आली. भाजपाने आपल्या यादीत एकाही मुस्लीम उमेदवाराला स्थान दिले नाही. अगदी शेवटच्या क्षणाला यादीत फेरबदल करीत विद्यमान परिवहन मंत्री युनुस खान यांना संधी देण्यात आली. मात्र, दुपारपर्यंत युनुस खान ९ हजार मतांनी पिछाडीवर होते. काँग्रेसचे संभाव्य मुख्यमंत्री सचिन पायलट यांना आव्हान देण्यासाठीच युनुस खान यांचा बळी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

२०१३च्या निवडणुकीत भाजपाने १६३ जागा जिंकत काँग्रेसचे पानीपत केले होते. त्यावेळी काँग्रेला केवळ २१ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानातील सर्व २५ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. राजस्थानी मतदारांचा तेव्हाचा कल पाहता भाजपा पुढची दहा वर्षे तरी सत्तेवर राहील, असे अंदाज होते. मात्र, वर्तमान निकाल पाहता राजस्थानसारखे मोठे राज्य हातातू निसटणे ही आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपासाठी धोक्याची घंटा आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा