शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

खापचे तुघलकी फर्मान, पक्ष्याचं अंडं फोडलं म्हणून चिमुरडीला दिली 'ही' शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 12:12 IST

राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील हरिपूरा गावामध्ये एक संतापजनक घटना

जयपूर - राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील हरिपूरा गावामध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. गावातील एका पाच वर्षाच्या चिमुकलीने पक्ष्याचं अंडं फोडलं म्हणून चिमुरडीला खाप पंचायतीने घरात प्रवेश करू न दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच या निरागस मुलीला तब्बल 11 दिवस घराच्या बाहेर राहण्याची शिक्षा देण्यात आली. तसेच कोणी तिच्याशी बोलले अथवा तिला जेवण देण्याचा प्रयत्न जरी केला तर मुलीच्या शिक्षेत वाढ केली जाईल असा फतवाही खापने काढला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिपुरा येथील एका प्राथमिक शाळेत ही चिमुरडी शिक्षण घेत आहे. शाळेत एक दिवस मुलीला पक्षाचं एक अंडं दिसलं तिने केवळ उत्सुकता म्हणून त्या अंड्याला हात लावला. मात्र या दरम्यान तिच्याकडून चुकून ते अंडं फुटलं. अंडं फुटल्याची बातमी संपूर्ण गावात पसरली. गावातील खाप पंचायतीपर्यंतही ही गोष्ट पोहोचली. त्यानंतर गावातील सर्व मंडळी ही मुलीच्या घराबाहेर गोळा झाली.

अंडं फुटणे ही बाब गावासाठी अत्यंत अशुभ असल्याचं सांगत गावातील मंडळींनी मुलीच्या कुटुंबीयांना धारेवर धरलं. तसेच मुलीला ११ दिवसांसाठी घराबाहेर ठेवण्याची शिक्षा पंचांनी जाहीर केली. मुलीच्या वडिलांनी याला विरोध केला असता, संपूर्ण कुटुंबालाच घराबाहेर हाकलून देण्याची धमकी पंचांनी दिली. मात्र मुलीच्या वडिलांना हिंमत करून 12 जुलैला पोलिसांत तक्रार दाखल केली आणि हा संपूर्ण प्रकार उघड झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान