शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खापचे तुघलकी फर्मान, पक्ष्याचं अंडं फोडलं म्हणून चिमुरडीला दिली 'ही' शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 12:12 IST

राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील हरिपूरा गावामध्ये एक संतापजनक घटना

जयपूर - राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील हरिपूरा गावामध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. गावातील एका पाच वर्षाच्या चिमुकलीने पक्ष्याचं अंडं फोडलं म्हणून चिमुरडीला खाप पंचायतीने घरात प्रवेश करू न दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच या निरागस मुलीला तब्बल 11 दिवस घराच्या बाहेर राहण्याची शिक्षा देण्यात आली. तसेच कोणी तिच्याशी बोलले अथवा तिला जेवण देण्याचा प्रयत्न जरी केला तर मुलीच्या शिक्षेत वाढ केली जाईल असा फतवाही खापने काढला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिपुरा येथील एका प्राथमिक शाळेत ही चिमुरडी शिक्षण घेत आहे. शाळेत एक दिवस मुलीला पक्षाचं एक अंडं दिसलं तिने केवळ उत्सुकता म्हणून त्या अंड्याला हात लावला. मात्र या दरम्यान तिच्याकडून चुकून ते अंडं फुटलं. अंडं फुटल्याची बातमी संपूर्ण गावात पसरली. गावातील खाप पंचायतीपर्यंतही ही गोष्ट पोहोचली. त्यानंतर गावातील सर्व मंडळी ही मुलीच्या घराबाहेर गोळा झाली.

अंडं फुटणे ही बाब गावासाठी अत्यंत अशुभ असल्याचं सांगत गावातील मंडळींनी मुलीच्या कुटुंबीयांना धारेवर धरलं. तसेच मुलीला ११ दिवसांसाठी घराबाहेर ठेवण्याची शिक्षा पंचांनी जाहीर केली. मुलीच्या वडिलांनी याला विरोध केला असता, संपूर्ण कुटुंबालाच घराबाहेर हाकलून देण्याची धमकी पंचांनी दिली. मात्र मुलीच्या वडिलांना हिंमत करून 12 जुलैला पोलिसांत तक्रार दाखल केली आणि हा संपूर्ण प्रकार उघड झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान