शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

"दिल्लीत गोळीबार सर्रास, दहशतीचे वातावरण...", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 18:51 IST

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही सिंगला स्वीट्ससमोर उभे आहोत, हे खूप व्यस्त मार्केट आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. रविवारी अरविंद केजरीवाल दिल्लीतील टिळक नगर येथील कार शोरूममध्ये गेले होते. याठिकाणी जून महिन्यात खंडणीसाठी गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. याठिकाणी अरविंद केजरीवाल यांनी पीडित कुटुंबाचीही भेट घेतली. यानंतर सिंगला स्वीट्स येथेही भेट दिली. येथे काही महिन्यांपूर्वी दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केला होता.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही सिंगला स्वीट्ससमोर उभे आहोत, हे खूप व्यस्त मार्केट आहे. काही महिन्यांपूर्वी सिंगला स्वीट्स येथे दोन दुचाकीस्वार आले आणि त्यांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. शूट आऊटच्या काही दिवस आधी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. शूट आऊटनंतर पुन्हा फोन आला आणि तुम्हाला काहीही होऊ शकते, अशी धमकी दिली. दिल्लीत असे गोळीबार सामान्य झाले आहेत. नागलोईला गेलो होतो, तिथेही गोळीबार झाला होता. यावर्षी 160 खंडणीचे कॉल आले आहेत, जे पोलीस रेकॉर्डमध्ये आले आहेत. अनेकजण भीतीमुळे सांगत नाहीत.

सध्या दिल्लीत दहशतीचे वातावरण आहे. आपण अशी दिल्ली कधीच पाहिली नव्हती. आम्ही शांतताप्रिय लोक आहोत. आपल्याला शांततेत राहायचे आहे. काही लोक इतर राज्यात व्यवसाय घेऊन जात आहेत, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच, हे गँगस्टर 17-17 वर्षांच्या मुलांचा वापर करत आहेत. दुसरीकडे, बेरोजगारी पसरत असून अशा कामात बेरोजगार मुलांना कामाला लावले जात आहे. मला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगायचे आहे की, आम्हाला राजकारण नको आहे. तुम्हाला वाटेल ते काम करा, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी निशाणा साधला.

नरेश बालियान यांच्या अटकेवरूनही हल्लाबोलआपचे आमदार नरेश बालियान यांनी अटक करण्यात आली आहे. या अटकेचा संदर्भ देत अरविंद केजरीवाल म्हणाले की, नरेश बालियान यांना 35-40 वेळा धमकीचे फोन आले होते. पीडित हे आमदार असून त्यांना अटक करण्यात आली आहे. हा कोणता संदेश दिला जात आहे? तुम्हाला धमक्या दिल्यास आणि तुम्ही तक्रार केल्यास तुम्हाला अटक केली जाईल. पीडित लोकांना आपण संरक्षण दिले पाहिजे, असे सांगत अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी