शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

केरळमध्ये पावसाचा हाहाकार, ६७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 04:21 IST

केरळमध्ये ८ आॅगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे. वायनाड, कोझीकोड, कन्नूर, कासरगोड, मलप्पुरम, पलक्कड, इदुक्की व एरनाकुलम येथे अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोची : केरळमध्ये ८ आॅगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे. वायनाड, कोझीकोड, कन्नूर, कासरगोड, मलप्पुरम, पलक्कड, इदुक्की व एरनाकुलम येथे अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. निसर्गाच्या या प्रकोपामुळे आतापर्यंत ६७ जणांचा बळी गेला असून मुसळधार पावसाचा फटका येथील विमानसेवेलाही बसला आहे. अतिदक्षतेचा इशारा म्हणून कोची येथील आंतरराष्टÑीय विमानतळाच्या सेवा शनिवार, १८ आॅगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.पावसामुळे येथील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे़ त्यामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. मदत व बचाव कार्य वेगाने सुरू आहे. कोची विमानतळानजीक असलेल्या पेरियार नदीवरील धरण अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झाल्याने पाणी विमानतळाच्या धावपट्टीवर आले आहे. त्यातच येथील वायंड, कोझिकोडे, कन्नूर, केसरगोडे, मलप्पूरम, पलक्कड, इडुक्की तसेच इरनाकुलम जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वप्रथम खबरदारी म्हणून बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत येथून एकाही विमानाचे उड्डाण न करण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला होता. पुढील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विमानसेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे कोचीन विमानतळ प्रशासनाने जाहीर केले होते. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने तसेच पाण्याचा निचरा होत नसल्याने आता शनिवारपर्यंत विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने जाहीर केला आहे.कोझीकोड, इरानल स्थानकांदरम्यान दरड कोसळल्यामुळे गुरुपायर-चेन्नई एग्मोर एक्स्प्रेस, कन्याकुमारी-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस, दिबुगढ-कन्याकुमारी विवेक एक्स्प्रेस आणि गांधीधाम-तिरुनेलवली हमसफर एक्स्प्रेस या चार गाड्या उशिराने धावत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :RainपाऊसKeralaकेरळ