शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये पावसाचा हाहाकार, ६७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 04:21 IST

केरळमध्ये ८ आॅगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे. वायनाड, कोझीकोड, कन्नूर, कासरगोड, मलप्पुरम, पलक्कड, इदुक्की व एरनाकुलम येथे अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोची : केरळमध्ये ८ आॅगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे. वायनाड, कोझीकोड, कन्नूर, कासरगोड, मलप्पुरम, पलक्कड, इदुक्की व एरनाकुलम येथे अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. निसर्गाच्या या प्रकोपामुळे आतापर्यंत ६७ जणांचा बळी गेला असून मुसळधार पावसाचा फटका येथील विमानसेवेलाही बसला आहे. अतिदक्षतेचा इशारा म्हणून कोची येथील आंतरराष्टÑीय विमानतळाच्या सेवा शनिवार, १८ आॅगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.पावसामुळे येथील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे़ त्यामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. मदत व बचाव कार्य वेगाने सुरू आहे. कोची विमानतळानजीक असलेल्या पेरियार नदीवरील धरण अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झाल्याने पाणी विमानतळाच्या धावपट्टीवर आले आहे. त्यातच येथील वायंड, कोझिकोडे, कन्नूर, केसरगोडे, मलप्पूरम, पलक्कड, इडुक्की तसेच इरनाकुलम जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वप्रथम खबरदारी म्हणून बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत येथून एकाही विमानाचे उड्डाण न करण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला होता. पुढील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विमानसेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे कोचीन विमानतळ प्रशासनाने जाहीर केले होते. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने तसेच पाण्याचा निचरा होत नसल्याने आता शनिवारपर्यंत विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने जाहीर केला आहे.कोझीकोड, इरानल स्थानकांदरम्यान दरड कोसळल्यामुळे गुरुपायर-चेन्नई एग्मोर एक्स्प्रेस, कन्याकुमारी-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस, दिबुगढ-कन्याकुमारी विवेक एक्स्प्रेस आणि गांधीधाम-तिरुनेलवली हमसफर एक्स्प्रेस या चार गाड्या उशिराने धावत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :RainपाऊसKeralaकेरळ