शहरं
Join us  
Trending Stories
1
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
2
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
4
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
5
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
6
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
7
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
8
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
9
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
10
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
11
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
12
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
13
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
14
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
15
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
16
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
17
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
18
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
19
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
20
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!

आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 19:56 IST

आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे १५ जिल्ह्यातील ७८ हजार नागरिकांवर परिणाम झाला आहे

मागील काही दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या पावसामुळे भारताच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे रस्ते वाहतूक, रेल्वे आणि इतर सेवांवरही परिणाम झाला आहे. आसाम, त्रिपुरा, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुरामुळे आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवामान खात्याने पश्चिमी त्रिपुरा आणि खोवाई भागात रेड अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय भूस्खलन, पीकांचे नुकसान आणि वीज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता वर्तवली आहे.

त्रिपुरात १३०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी नेले

त्रिपुरात मुसळधार पाऊस पडत असून याठिकाणी १३०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. इम्फालमध्ये सुरक्षा जवान पाऊस आणि पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला तैनात आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आसाम, मणिपूर, सिक्किम, अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्‍यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन केंद्राने राज्याला दिले आहे. 

आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे १५ जिल्ह्यातील ७८ हजार नागरिकांवर परिणाम झाला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसवा हे अमित शाह यांच्या संपर्कात आहेत. राज्यातील परिस्थितीबाबत त्यांनी गृहमंत्र्यांना माहिती देत मदतीची विनंती केली आहे. केंद्रानेही राज्य सरकारला मदतीचे आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्र्‍यांनी त्यांच्या सोशल मिडिया खात्यावरून दिली आहे.

दरम्यान, रविवारी संध्याकाळी अचानक राजधानी दिल्लीतही वातावरणात बदल पाहायला मिळाला. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले. ज्यातून वादळ आणि पावसाची स्थिती आली. दिल्लीत हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत दिल्लीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीत ४ जूनपासून मान्सून सुरू होईल असं हवामान खात्याने म्हटलं होते. परंतु त्याआधीच वातावरणात बदल पाहायला मिळाला आहे. 

टॅग्स :Rainपाऊस