शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
4
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
5
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
6
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
7
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
8
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
9
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
10
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
11
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
12
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
13
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
14
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
15
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
16
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
17
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
18
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
19
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
Daily Top 2Weekly Top 5

आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 19:56 IST

आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे १५ जिल्ह्यातील ७८ हजार नागरिकांवर परिणाम झाला आहे

मागील काही दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या पावसामुळे भारताच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे रस्ते वाहतूक, रेल्वे आणि इतर सेवांवरही परिणाम झाला आहे. आसाम, त्रिपुरा, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुरामुळे आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवामान खात्याने पश्चिमी त्रिपुरा आणि खोवाई भागात रेड अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय भूस्खलन, पीकांचे नुकसान आणि वीज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता वर्तवली आहे.

त्रिपुरात १३०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी नेले

त्रिपुरात मुसळधार पाऊस पडत असून याठिकाणी १३०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. इम्फालमध्ये सुरक्षा जवान पाऊस आणि पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला तैनात आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आसाम, मणिपूर, सिक्किम, अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्‍यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन केंद्राने राज्याला दिले आहे. 

आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे १५ जिल्ह्यातील ७८ हजार नागरिकांवर परिणाम झाला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसवा हे अमित शाह यांच्या संपर्कात आहेत. राज्यातील परिस्थितीबाबत त्यांनी गृहमंत्र्यांना माहिती देत मदतीची विनंती केली आहे. केंद्रानेही राज्य सरकारला मदतीचे आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्र्‍यांनी त्यांच्या सोशल मिडिया खात्यावरून दिली आहे.

दरम्यान, रविवारी संध्याकाळी अचानक राजधानी दिल्लीतही वातावरणात बदल पाहायला मिळाला. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले. ज्यातून वादळ आणि पावसाची स्थिती आली. दिल्लीत हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत दिल्लीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीत ४ जूनपासून मान्सून सुरू होईल असं हवामान खात्याने म्हटलं होते. परंतु त्याआधीच वातावरणात बदल पाहायला मिळाला आहे. 

टॅग्स :Rainपाऊस