शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने घेतले २,०३८ बळी; बिहारसह हिमाचल प्रदेशात सर्वाधिक मृत्यू; अनेक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 06:55 IST

१ एप्रिल ते १७ ऑगस्ट दरम्यान पाऊस आणि पुरामुळे १०१ लोक बेपत्ता झाले आणि १,५८४ जण जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशभरात या पावसाळ्यात पूर, वीज पडणे आणि भूस्खलनामुळे किमान २,०३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये सर्वाधिक ५१८ आणि हिमाचल प्रदेशात ३३० लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी १ एप्रिल ते १७ ऑगस्ट दरम्यान पाऊस आणि पुरामुळे १०१ लोक बेपत्ता झाले आणि १,५८४ जण जखमी झाले आहेत.

कोणत्या राज्याला सर्वाधिक फटका? 

पाऊस, भूस्खलन आणि वीज पडून मध्य प्रदेशातील ४०, आसाममधील ३० आणि उत्तर प्रदेशातील २७ जिल्ह्यांसह देशभरातील ३३५ जिल्ह्यांना फटका बसला आहे. हिमाचल प्रदेशातील १२ जिल्हे आणि उत्तराखंडमधील सात जिल्हेही पावसाळ्यात पूर आणि भूस्खलनाने प्रभावित झाले आहेत.

होतं नव्हतं तेवढं गेलं, हाती राहिला अंधार!

उत्तराखंडमध्ये पावसाने लोकांसमोर आव्हानांचा डोंगर निर्माण केला आहे. पौडी गढवाल जिल्ह्यातील बैरागढ गावात ढगफुटीनंतर नुकसान झालेल्या भागात घरांभोवती दगड-मातीचे ढिगारे दिसत आहेत. छत्तीसगड सरकारने हिमाचलसाठी ११ कोटी रुपयांची मदत देत असल्याचे जाहीर केले आहे.

पाऊस, पूर, भूस्खलन आणि वीज पडून मृत्यू

गुजरात    १६५ मध्य प्रदेश    १३८ कर्नाटक    १०७ महाराष्ट्र    १०७ छत्तीसगड    ९० उत्तराखंड    ७५

८९२ लोकांचा बुडून मृत्यू, ५०६  जण वीज पडून मृत्यू, १८६  भूस्खलनामुळे मृत्यू झाला. ४५४ जणांचा इतर कारणांमुळे, १४      एनडीआरएफ पथके महाराष्ट्रात, १६० राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या टीम विविध राज्यांमध्ये तैनात.

 

टॅग्स :BiharबिहारHimachal Pradeshहिमाचल प्रदेशfloodपूर