शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पावसाने घेतले २,०३८ बळी; बिहारसह हिमाचल प्रदेशात सर्वाधिक मृत्यू; अनेक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 06:55 IST

१ एप्रिल ते १७ ऑगस्ट दरम्यान पाऊस आणि पुरामुळे १०१ लोक बेपत्ता झाले आणि १,५८४ जण जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशभरात या पावसाळ्यात पूर, वीज पडणे आणि भूस्खलनामुळे किमान २,०३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये सर्वाधिक ५१८ आणि हिमाचल प्रदेशात ३३० लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी १ एप्रिल ते १७ ऑगस्ट दरम्यान पाऊस आणि पुरामुळे १०१ लोक बेपत्ता झाले आणि १,५८४ जण जखमी झाले आहेत.

कोणत्या राज्याला सर्वाधिक फटका? 

पाऊस, भूस्खलन आणि वीज पडून मध्य प्रदेशातील ४०, आसाममधील ३० आणि उत्तर प्रदेशातील २७ जिल्ह्यांसह देशभरातील ३३५ जिल्ह्यांना फटका बसला आहे. हिमाचल प्रदेशातील १२ जिल्हे आणि उत्तराखंडमधील सात जिल्हेही पावसाळ्यात पूर आणि भूस्खलनाने प्रभावित झाले आहेत.

होतं नव्हतं तेवढं गेलं, हाती राहिला अंधार!

उत्तराखंडमध्ये पावसाने लोकांसमोर आव्हानांचा डोंगर निर्माण केला आहे. पौडी गढवाल जिल्ह्यातील बैरागढ गावात ढगफुटीनंतर नुकसान झालेल्या भागात घरांभोवती दगड-मातीचे ढिगारे दिसत आहेत. छत्तीसगड सरकारने हिमाचलसाठी ११ कोटी रुपयांची मदत देत असल्याचे जाहीर केले आहे.

पाऊस, पूर, भूस्खलन आणि वीज पडून मृत्यू

गुजरात    १६५ मध्य प्रदेश    १३८ कर्नाटक    १०७ महाराष्ट्र    १०७ छत्तीसगड    ९० उत्तराखंड    ७५

८९२ लोकांचा बुडून मृत्यू, ५०६  जण वीज पडून मृत्यू, १८६  भूस्खलनामुळे मृत्यू झाला. ४५४ जणांचा इतर कारणांमुळे, १४      एनडीआरएफ पथके महाराष्ट्रात, १६० राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या टीम विविध राज्यांमध्ये तैनात.

 

टॅग्स :BiharबिहारHimachal Pradeshहिमाचल प्रदेशfloodपूर