शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासादरम्यान साहित्य चोरीला गेले तर रेल्वे भरपाई देणार? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 11:29 IST

आजवर रेल्वे आपले हात झटकत होती. रेल्वेमधून प्रवास करत असताना आरक्षित तिकीटावरून प्रवास करणारे प्रवासीच आरक्षित डब्यांमध्ये असावेत. या डब्यांमध्ये कोणालाही घुसू दिले जाते. त्यात चोर देखील असतात. यामुळे प्रवाशांची यात काय चूक असे प्रत्येकाला वाटते.

ट्रेनमधून प्रवास करत असताना जर तुमचे मौल्यवान दागिने, साहित्य चोरीला गेले तर काय करता? रेल्वे स्टेशनवर तक्रार केली जाते. पुढे ते सामान मिळाले तर ठीक नाहीतर नुकसान होते. परंतू, नुकताच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निकाल दिला आहे. जर प्रवाशाचे पैसे, दागिने किंवा वस्तू ट्रेनमधून चोरीला गेली तर त्याला रेल्वेच्या सेवेमधील त्रुटी मानले जाऊ शकत नाही, असा महत्वाचा निर्णय कोर्टाने दिला आहे. 

रेल्वेमधून प्रवास करत असताना आरक्षित तिकीटावरून प्रवास करणारे प्रवासीच आरक्षित डब्यांमध्ये असावेत. या डब्यांमध्ये कोणालाही घुसू दिले जाते. त्यात चोर देखील असतात. यामुळे प्रवाशांची यात काय चूक असे प्रत्येकाला वाटते. परंतू, आजवर रेल्वे आपले हात झटकत होती. आता सर्वोच्च न्यायालयानेच रेल्वेला क्लिन चिट दिली आहे. 

एक व्यापारी रेल्वेतून सोबत एक लाख रुपये घेऊन प्रवास करत होता. २००५ चे हे प्रकरण आहे. प्रवासावेळी त्याचे १ लाख रुपये चोरीला गेले. व्यापाऱ्याने ते कंबरेच्या पट्ट्याला बांधले होते आणि रात्रीची वेळ असल्याने तो झोपला होता. २८ एप्रिलला पहाटे ते साडे तीन वाजता उठले तेव्हा त्यांची पँट फाडली होती आणि पैसे चोरीला गेले होते. दिल्ली स्टेशनवर उतरून त्यांनी जीआरपीकडे तक्रार दाखल केली होती. 

काही दिवसांनी त्यांनी शाहजहांपूरच्या जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती. यामध्ये त्यांनी ट्राऊझरचे नुकसान म्हणून ४०० रुपये आणि एका लाख रुपयांवर १८ टक्के व्याजासह द्यावेत अशी मागणी केली होती. रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

रेल्वेने यावर उत्तर देताना आमच्याकडे रजिस्टर केलेल्या वस्तूंची चोरी झाली तरच आम्ही जबाबदार आहोत. प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांना सावध करण्यासाठी नोटीस लावल्या जातात. यामध्ये आपल्या सामानाचे आपणच संरक्षण करावे असे सांगितले जाते. प्रवासी आणि त्यांच्या सामानाची सुरक्षा जीआरपी आणि राज्य सरकारांच्या अखत्यारीत असते, अशी कारणे दिली होती. 

जिल्हा मंचाने 2006 मध्ये रेल्वेने व्यापाऱ्याला एक लाख रुपये देण्याचे आदेश दिले. मात्र, व्याज आणि फाटलेल्या पँटच्या भरपाईचा दावा मंचाने फेटाळला होता. यावरील अपिल यूपी राज्य ग्राहक मंचाने 2014 मध्ये व 2015 मध्ये राष्ट्रीय ग्राहक मंचानेही रेल्वेचे अपील फेटाळून लावले होते. रेल्वेला सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असता जेव्हा प्रवासी आपल्या सामानाचे रक्षण करू शकत नाही, तेव्हा चोरी झाल्यास रेल्वेच्या सेवेत कमतरता आहे, असे कसे म्हणता येईल असे विचारत रेल्वे जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय