शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

प्रवासादरम्यान साहित्य चोरीला गेले तर रेल्वे भरपाई देणार? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 11:29 IST

आजवर रेल्वे आपले हात झटकत होती. रेल्वेमधून प्रवास करत असताना आरक्षित तिकीटावरून प्रवास करणारे प्रवासीच आरक्षित डब्यांमध्ये असावेत. या डब्यांमध्ये कोणालाही घुसू दिले जाते. त्यात चोर देखील असतात. यामुळे प्रवाशांची यात काय चूक असे प्रत्येकाला वाटते.

ट्रेनमधून प्रवास करत असताना जर तुमचे मौल्यवान दागिने, साहित्य चोरीला गेले तर काय करता? रेल्वे स्टेशनवर तक्रार केली जाते. पुढे ते सामान मिळाले तर ठीक नाहीतर नुकसान होते. परंतू, नुकताच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निकाल दिला आहे. जर प्रवाशाचे पैसे, दागिने किंवा वस्तू ट्रेनमधून चोरीला गेली तर त्याला रेल्वेच्या सेवेमधील त्रुटी मानले जाऊ शकत नाही, असा महत्वाचा निर्णय कोर्टाने दिला आहे. 

रेल्वेमधून प्रवास करत असताना आरक्षित तिकीटावरून प्रवास करणारे प्रवासीच आरक्षित डब्यांमध्ये असावेत. या डब्यांमध्ये कोणालाही घुसू दिले जाते. त्यात चोर देखील असतात. यामुळे प्रवाशांची यात काय चूक असे प्रत्येकाला वाटते. परंतू, आजवर रेल्वे आपले हात झटकत होती. आता सर्वोच्च न्यायालयानेच रेल्वेला क्लिन चिट दिली आहे. 

एक व्यापारी रेल्वेतून सोबत एक लाख रुपये घेऊन प्रवास करत होता. २००५ चे हे प्रकरण आहे. प्रवासावेळी त्याचे १ लाख रुपये चोरीला गेले. व्यापाऱ्याने ते कंबरेच्या पट्ट्याला बांधले होते आणि रात्रीची वेळ असल्याने तो झोपला होता. २८ एप्रिलला पहाटे ते साडे तीन वाजता उठले तेव्हा त्यांची पँट फाडली होती आणि पैसे चोरीला गेले होते. दिल्ली स्टेशनवर उतरून त्यांनी जीआरपीकडे तक्रार दाखल केली होती. 

काही दिवसांनी त्यांनी शाहजहांपूरच्या जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती. यामध्ये त्यांनी ट्राऊझरचे नुकसान म्हणून ४०० रुपये आणि एका लाख रुपयांवर १८ टक्के व्याजासह द्यावेत अशी मागणी केली होती. रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

रेल्वेने यावर उत्तर देताना आमच्याकडे रजिस्टर केलेल्या वस्तूंची चोरी झाली तरच आम्ही जबाबदार आहोत. प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांना सावध करण्यासाठी नोटीस लावल्या जातात. यामध्ये आपल्या सामानाचे आपणच संरक्षण करावे असे सांगितले जाते. प्रवासी आणि त्यांच्या सामानाची सुरक्षा जीआरपी आणि राज्य सरकारांच्या अखत्यारीत असते, अशी कारणे दिली होती. 

जिल्हा मंचाने 2006 मध्ये रेल्वेने व्यापाऱ्याला एक लाख रुपये देण्याचे आदेश दिले. मात्र, व्याज आणि फाटलेल्या पँटच्या भरपाईचा दावा मंचाने फेटाळला होता. यावरील अपिल यूपी राज्य ग्राहक मंचाने 2014 मध्ये व 2015 मध्ये राष्ट्रीय ग्राहक मंचानेही रेल्वेचे अपील फेटाळून लावले होते. रेल्वेला सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असता जेव्हा प्रवासी आपल्या सामानाचे रक्षण करू शकत नाही, तेव्हा चोरी झाल्यास रेल्वेच्या सेवेत कमतरता आहे, असे कसे म्हणता येईल असे विचारत रेल्वे जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय