शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

धक्कादायक! नादुरुस्त चाकावर 200 किमी चालविली सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 11:48 IST

मोठा अपघात घडण्याची शक्यता होती.

जमशेदपूर : मुंबईहून हावडाला जाणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या थर्ड एसी कोचची चाके नादुरुस्त झाल्याचे कळूनही रेल्वे अधिकाऱ्यांनी ही एक्स्प्रेस चक्क 200 किमी चालविली. यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. अधिकाऱ्यांचा मोठा हलगर्जीपणा उघड झाला आहे. 

मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकातून सुटलेली हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस टाटानगर स्थानकावर आली असता थर्ड एसी डब्यातील प्रवाशांनी सततच्या मोठ्या आवाजामुळे त्रस्त झाल्याने गोंधळ घातला. मात्र, तो डबा न बदलताच ही रेल्वे हावडापर्यंत चालविण्यात आली. हे अंतर 200 किमी आहे. केवळ रेल्वे चालकाला वेग कमी ठेवण्यास सांगण्यात आले. 

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनुसार सीएसएमटीहून सुटल्यानंतर एक्स्प्रेस सोमवारी 2.55 मिनिटांनी टाटनगरला पोहोचायला हवी होती. मात्र, ही ट्रेन दहा तास उशिराने पोहोचली. ही ट्रेन वेगात महालीमुरुम स्टेशनवरून गेल्यानंतर काहीतरी बिघाडा झाल्याची माहिती चक्रधरपूर परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली. यावेळी थर्ड एसीच्या बी 1 कोचच्या चाकामध्ये गडबड असल्याचे समजू शकले आणि ट्रेन कधीही रुळांवरून घसरू शकते. यानंतर लगेचच टाटानगरच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. दुरुस्त करणारे कर्मचारी टाटानरगला ट्रेन पोहोचायच्या आत पोहोचले होते. 

तपासणीनंतर कोचला कापण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यामध्ये 45 मिनिटे गेली. यावेळी टाटानगरला येणारी इतर ट्रेन बाजुला थांबविण्यात आली होती. ही संख्या वाढत होती. याचा दबावही रेल्वे अधिकाऱ्यांवर होता. यामुळे हावडा ट्रेनला नादुरुस्त चाकावरच हावड्याला पाठविण्यात आले. हे समजल्यानंतर कोचमधील प्रवाशांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. मात्र, रेल्वेने त्यांच्या सुरक्षेकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले.  

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे