शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

धक्कादायक! नादुरुस्त चाकावर 200 किमी चालविली सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 11:48 IST

मोठा अपघात घडण्याची शक्यता होती.

जमशेदपूर : मुंबईहून हावडाला जाणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या थर्ड एसी कोचची चाके नादुरुस्त झाल्याचे कळूनही रेल्वे अधिकाऱ्यांनी ही एक्स्प्रेस चक्क 200 किमी चालविली. यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. अधिकाऱ्यांचा मोठा हलगर्जीपणा उघड झाला आहे. 

मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकातून सुटलेली हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस टाटानगर स्थानकावर आली असता थर्ड एसी डब्यातील प्रवाशांनी सततच्या मोठ्या आवाजामुळे त्रस्त झाल्याने गोंधळ घातला. मात्र, तो डबा न बदलताच ही रेल्वे हावडापर्यंत चालविण्यात आली. हे अंतर 200 किमी आहे. केवळ रेल्वे चालकाला वेग कमी ठेवण्यास सांगण्यात आले. 

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनुसार सीएसएमटीहून सुटल्यानंतर एक्स्प्रेस सोमवारी 2.55 मिनिटांनी टाटनगरला पोहोचायला हवी होती. मात्र, ही ट्रेन दहा तास उशिराने पोहोचली. ही ट्रेन वेगात महालीमुरुम स्टेशनवरून गेल्यानंतर काहीतरी बिघाडा झाल्याची माहिती चक्रधरपूर परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली. यावेळी थर्ड एसीच्या बी 1 कोचच्या चाकामध्ये गडबड असल्याचे समजू शकले आणि ट्रेन कधीही रुळांवरून घसरू शकते. यानंतर लगेचच टाटानगरच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. दुरुस्त करणारे कर्मचारी टाटानरगला ट्रेन पोहोचायच्या आत पोहोचले होते. 

तपासणीनंतर कोचला कापण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यामध्ये 45 मिनिटे गेली. यावेळी टाटानगरला येणारी इतर ट्रेन बाजुला थांबविण्यात आली होती. ही संख्या वाढत होती. याचा दबावही रेल्वे अधिकाऱ्यांवर होता. यामुळे हावडा ट्रेनला नादुरुस्त चाकावरच हावड्याला पाठविण्यात आले. हे समजल्यानंतर कोचमधील प्रवाशांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. मात्र, रेल्वेने त्यांच्या सुरक्षेकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले.  

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे