शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! आता OTP च्या मदतीने ई-तिकीटवर मिळणार रिफंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 10:58 IST

प्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून सुविधा देण्यात येत असतात.

ठळक मुद्देरेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे कारण आता OTP च्या मदतीने ई-तिकीटवर प्रवाशांना रिफंड मिळणार आहे.प्रवाशांना टिकीट कॅन्सल करण्यासाठी आयआरसीटीसीच्याद्वारे देण्यात आलेल्या पासवर्डच्या मदतीने रिफंड मिळण्याची सुविधा देण्यात येणार.ओटीपी आधारित रिफंड प्रक्रिया ही प्रवाशांच्या फायद्याची आहे.

नवी दिल्ली - प्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून सुविधा देण्यात येत असतात. अधिकृत रेल्वे एजंटच्या माध्यमातून तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी रेल्वे प्रयत्न करत आहे. रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे कारण आता OTP च्या मदतीने ई-तिकीटवर प्रवाशांना रिफंड मिळणार आहे. यासाठी आयआरसीटीसी ओटीपी आधारित प्रणाली आणली आहे. 

प्रवाशांना टिकीट कॅन्सल करण्यासाठी आयआरसीटीसीच्याद्वारे देण्यात आलेल्या पासवर्डच्या मदतीने रिफंड मिळण्याची सुविधा देण्यात येणार आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीने (IRCTC) ही सुविधा केवळ अधिकृत एजेंटच्या माध्यमातून बूक करण्यात येणाऱ्या ई-तिकीटांवर लागू असणार असल्याची माहिती दिली आहे. ओटीपी आधारित रिफंड प्रक्रिया ही प्रवाशांच्या फायद्याची आहे. त्याचबरोबर यामुळे व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येणार आहे. 

नव्या सुविधेमध्ये जेव्हा एखादा प्रवासी अधिकृत आयआरसीटीसी एजेंटच्या माध्यमातून बूक केलेली तिकीट किंवा वेटलिस्ट तिकीट कॅन्सल करत असेल तर त्याला त्याचे रिफंड पैसे आणि वन टाईम पासवर्ड (ओटीपी) चा एक मेसेज मोबाईल नंबरवर येईल. प्रवाशांना रिफंडसाठी तो ओटीपी ज्या एजेंटने तिकीट बूक केलं आहे त्याला द्यावा लागणार आहे. त्यानंतर पैसे रिफंड मिळणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकृत एजेंटच्या माध्यमातून दररोज जवळपास 27 टक्के तिकीट बूक केली जातात. तर यातील 20 टक्के तिकीट कॅन्सल देखील केली जातात. 

काही दिवसांपूर्वी लखनऊ दरम्यान चालणाऱ्या तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेच्या सहाय्यक कंपनी आयआरसीटीसीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये तेजस एक्सप्रेस ट्रेनला उशिर झाल्यास आयआरसीटीसी प्रवाशांना भरपाई देणार आहे. आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, तेजस ट्रेनला तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास प्रवाशांना 100 रुपये मिळणार आहे. तसेच दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास 250 रुपये प्रवाशांना भरपाई म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे. तेजस ट्रेनमध्ये पुरेसे प्रवासी प्रवास करत नसल्याने आयआरसीटीसीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्याचे ठरविले आहे.

 

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीrailwayरेल्वे