शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रेल्वेचा गलथान कारभार चव्हाट्यावर, प्रवाशाला रेल्वे रद्द झाल्याचा मेसेज; 25 हजाराचा दंड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 14:20 IST

अलाहाबादवरुन दिल्लीला जाणारी महाबोधी एक्स्प्रेस रद्द झाल्याचा मेसेज रेल्वेकडून प्रवाशांना पाठवण्यात आला होता.  ‘तिकिटाचे पैसे हवे असल्यास तिकीट रद्द करा,’ असा मेसेज रेल्वेकडून करण्यात आल्याने अनेक प्रवाशांनी तिकीट रद्द केले.

नवी दिल्ली:  प्रवाशाला चुकीचा मेसेज पाठवणं आयआरसीटीसीला चांगलंच महागात पडलं आहे. त्यामुळे प्रवाशाला 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. ग्राहक मंचाने याबाबत आदेश दिला आहे. त्यामुळे रेल्वेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 29 मे रोजी अलाहाबादवरुन दिल्लीला जाणारी महाबोधी एक्स्प्रेस रद्द झाल्याचा मेसेज रेल्वेकडून प्रवाशांना पाठवण्यात आला होता.  ‘तिकिटाचे पैसे हवे असल्यास तिकीट रद्द करा,’ असा मेसेज रेल्वेकडून करण्यात आल्याने अनेक प्रवाशांनी तिकीट रद्द केले.  वैशाली येथे राहणाऱ्या विजयप्रताप सिंह यांचा मुलगा अक्षत अलाहाबादवरुन दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेतून प्रवास करणार होता. रेल्वे रद्द झाल्याचा मेसेज आल्यामुळे त्यांनी तिकीट रद्द केले. मुलाला जाणं गरजेचं असल्यामुळे त्याच्यासाठी कॅब बुक केली. मुलगा दिल्लीला पोहोचल्यावर त्याला धक्काच बसला. कारण महाबोधी एक्स्प्रेस रद्द न झाल्याचे त्याला समजले. महाबोधी एक्स्प्रेस वेळेवर दिल्लीला पोहोचल्याची माहिती त्याला मिळाली. विशेष म्हणजे, विजयप्रताप सिंह  तिकीट रद्द करण्यास गेले असता केवळ एकाच तिकीटाचे पैसे त्यांना परत मिळाले. दुसरे तिकीट तत्काळमधील असल्याने रेल्वेने तिकिटाचे पैसे देण्यास नकार दिला, असे सिंह यांनी सांगितले. त्यानंतर सिंह यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली. अखेर  रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे सिंह यांना, शारिरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला, अशा शब्दांमध्ये ग्राहक मंचाने सिंह यांना 25 हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश चुकीचा मेसेज पाठवणा-या आयआरसीटीसीला दिले आहेत.   

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIRCTCआयआरसीटीसी