शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

Indian Railway News: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! विशेष ट्रेन्स, विशेष दर बंद होणार, पूर्वीप्रमाणे तिकिट दर आकारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 11:02 PM

Railway Ticket Fare : रेल्वे मंत्रालयानं मोठा निर्णय घेत पुन्हा एकदा नियमित ट्रेन सुरू करण्याचा ठरवलं आहे. पुढील काही दिवसांमध्ये १७०० पेक्षा अधिक ट्रेन नियनित ट्रेन म्हणून पुन्हा धावणार.

जवळपास दोन वर्षांपूर्वी जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला होता. भारतालाही याचा मोठा फटका बसला होता. कोरनाच्या पार्श्वभूमीवर नियमित रेल्वे गाड्यांवर बंदी घालण्यात आली होती. याऐवजी सरकारद्वारे विशेष रेल्वे चालवली जात होती. परंतु आता कोरोनाची महासाथ नियंत्रणात आली असून रेल्वे मंत्रालयानंदेखील मोठा निर्मया गेतला आहे. रेल्वे मंत्रालयानं आता या गाड्या पुन्हा नियमित गाड्या म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. देण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसांमध्ये १७०० पेक्षा अधिक ट्रेन या नियमित ट्रेन म्हणून पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत.

जारी करण्यात आलेल्या सर्क्युलरनुसार आता प्री कोविड असलेले तिकिटदर लागू करण्यात येणार आहे. याचाच अर्थ ज्या विशेष तिकिट दरानुसार रेल्वे सुरू होत्या त्याचे दर आता सामान्य होणार आहेत. याचाच अर्थ आता जनरल तिकिट असलेली सिस्टम संपणार आहे. आता केवळ रिझर्व्ह आणि वेटिंग तिकिट असलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी मिळणार. जनरल क्लासचं कोणतंही तिकिट आता मिळणार नाही. तसंच यापूर्वी बुक करण्यात आलेल्या तिकिटांवर कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसचं कोणतेही पैसे परतही करण्यात येणार नाही.

कोरोना काळातर करण्यात आले होते बदलकोरोना काळात करण्यात आलेले बदल आता हळूहळू कमी करण्यात येत आहे. परंतु कोरोनाचे प्रोटोकॉल मात्र पाळावे लागणार आहे. नियम तोडल्यास संबंधितांवर कारवाईदेखील केली जाणार आहे. २५ मार्च २०२० रोजी ट्रेन सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या होत्या. १६६ वर्षांच्या इतिहासात असं पहिल्यांदा करण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र मालगाड्या आणि श्रमिक ट्रेन्स सुरू करण्याला परवानगी देण्यात आली होती. परंतु त्यानंतर विशेष रेल्वे सेवा सलुरू करण्यात आली होती. तसंच नियमित ट्रेनचे क्रमांकही बदलण्यात आले होते. परंतु आता पुन्हा एकदा कोविडपूर्व स्थिती येणार आहे. विशेष ट्रेनची सेवा आता बंद केली जाणार असून तिकिट दरही पूर्वीप्रमाणेच असतील.

टॅग्स :railwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या