शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतील व्हीआयपी  संस्कृतीवर रेल्वेमंत्र्यांचा प्रहार, कर्मचाऱ्यांकडून घरगुती कामे करून घेऊ शकणार नाहीत अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 16:13 IST

रेल्वे खात्यामध्ये वर्षांनुवर्षे चालत आलेल्या व्हीआयपी संस्कृतीवर  रेल्वेमंत्रालयाने प्रहार केला आहे. रेल्वेमधील अधिकाऱ्यांना आपल्या घरी आणि कार्यालयात मेहनत करण्याचा सल्ला रेल्वे मंत्रालयाने दिला आहे.

नवी दिल्ली - रेल्वे खात्यामध्ये वर्षांनुवर्षे चालत आलेल्या व्हीआयपी संस्कृतीवर  रेल्वेमंत्रालयाने प्रहार केला आहे. रेल्वेमधील अधिकाऱ्यांना आपल्या घरी आणि कार्यालयात मेहनत करण्याचा सल्ला रेल्वे मंत्रालयाने दिला आहे. यापुढे रेल्वेमधील कर्मचाऱ्यांकडून घरकाम करून घेणे तात्काळ बंद करा, असे स्पष्ट आदेश रेल्वे मंत्रालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याबरोबरच तसेच रेल्वे मंत्रालयाने आपला 36 वर्षांपासून चालत आलेला एक प्रोटोकॉलही मोडीत काढला आहे. ज्यानुसार रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि बोर्ड मेंबर्सच्या विभागीय दौऱ्यांदरम्यान महाव्यस्थापकांना त्यांचे स्वागत आणि निरोपासाठी उपस्थित राहावे लागत असे. रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात फेरबदल करताना रेल्वे बोर्डाने 1981 च्या त्या आदेशांना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यानुसार रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हे प्रोटोकॉल निश्चित करण्यात आले होते. 28 सप्टेंबर रोजी रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या आदेशांमध्ये  रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि अन्य अधिकाऱ्यांच्या दौऱ्यादरम्यान, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर उपस्थित राहण्याच्या प्रोटोकॉल संदर्भातील मार्गदर्शक तत्त्व तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले. त्याबरोबरच  रेल्वेचा कुठलाही अधिकारी बुके किंवा भेटवस्तू स्वीकारणार नाही, असे रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विनी लोहानी यांनी सांगितले. रेल्वेचे सुमारे 30 हजार ट्रॅकमन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी काम करत आहेत. त्यांना त्वरित कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच अधिकाऱ्यांनी घरगुती कामांसाठी ठेवलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कामातून मुक्त करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या आदेशानंतर गेल्या महिनाभरात सुमारे 6 ते 7 हजार कर्मचारी कामावर परतले आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.   रेल्वेमधील व्हीआयपी संस्कृती संपवण्याबाबत माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,"अत्यंत खास परिस्थिती वगळता कुणालाही सुट देण्यात येणार नाही. सर्व कर्मचारी लवकरच कामावर परततील अशी अपेक्षा आहे." रेल्वे अधिकाऱ्यांनी आरामदारीय एक्झिक्युटिव्ह श्रेणी सोडून एसी-3 आणि स्लीपरमधून प्रवास करावा, असे आवाहनही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारतGovernmentसरकार