शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

रेल्वेतील व्हीआयपी  संस्कृतीवर रेल्वेमंत्र्यांचा प्रहार, कर्मचाऱ्यांकडून घरगुती कामे करून घेऊ शकणार नाहीत अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 16:13 IST

रेल्वे खात्यामध्ये वर्षांनुवर्षे चालत आलेल्या व्हीआयपी संस्कृतीवर  रेल्वेमंत्रालयाने प्रहार केला आहे. रेल्वेमधील अधिकाऱ्यांना आपल्या घरी आणि कार्यालयात मेहनत करण्याचा सल्ला रेल्वे मंत्रालयाने दिला आहे.

नवी दिल्ली - रेल्वे खात्यामध्ये वर्षांनुवर्षे चालत आलेल्या व्हीआयपी संस्कृतीवर  रेल्वेमंत्रालयाने प्रहार केला आहे. रेल्वेमधील अधिकाऱ्यांना आपल्या घरी आणि कार्यालयात मेहनत करण्याचा सल्ला रेल्वे मंत्रालयाने दिला आहे. यापुढे रेल्वेमधील कर्मचाऱ्यांकडून घरकाम करून घेणे तात्काळ बंद करा, असे स्पष्ट आदेश रेल्वे मंत्रालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याबरोबरच तसेच रेल्वे मंत्रालयाने आपला 36 वर्षांपासून चालत आलेला एक प्रोटोकॉलही मोडीत काढला आहे. ज्यानुसार रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि बोर्ड मेंबर्सच्या विभागीय दौऱ्यांदरम्यान महाव्यस्थापकांना त्यांचे स्वागत आणि निरोपासाठी उपस्थित राहावे लागत असे. रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात फेरबदल करताना रेल्वे बोर्डाने 1981 च्या त्या आदेशांना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यानुसार रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हे प्रोटोकॉल निश्चित करण्यात आले होते. 28 सप्टेंबर रोजी रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या आदेशांमध्ये  रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि अन्य अधिकाऱ्यांच्या दौऱ्यादरम्यान, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर उपस्थित राहण्याच्या प्रोटोकॉल संदर्भातील मार्गदर्शक तत्त्व तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले. त्याबरोबरच  रेल्वेचा कुठलाही अधिकारी बुके किंवा भेटवस्तू स्वीकारणार नाही, असे रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विनी लोहानी यांनी सांगितले. रेल्वेचे सुमारे 30 हजार ट्रॅकमन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी काम करत आहेत. त्यांना त्वरित कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच अधिकाऱ्यांनी घरगुती कामांसाठी ठेवलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कामातून मुक्त करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या आदेशानंतर गेल्या महिनाभरात सुमारे 6 ते 7 हजार कर्मचारी कामावर परतले आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.   रेल्वेमधील व्हीआयपी संस्कृती संपवण्याबाबत माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,"अत्यंत खास परिस्थिती वगळता कुणालाही सुट देण्यात येणार नाही. सर्व कर्मचारी लवकरच कामावर परततील अशी अपेक्षा आहे." रेल्वे अधिकाऱ्यांनी आरामदारीय एक्झिक्युटिव्ह श्रेणी सोडून एसी-3 आणि स्लीपरमधून प्रवास करावा, असे आवाहनही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारतGovernmentसरकार