शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'वंदे भारत'बाबत आणखी एक आनंदाची बातमी! आता 'या' नव्या मार्गावर धावणार ट्रेन; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 16:40 IST

देशात अनेक शहरांत वंद भारत रेल्वे सुरू झाली आहे, आता आणखी काही नवीन गाड्या सुरू करण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारने देशात नव्या वंदे भारत गाड्या आणल्या आहेत. गेल्या काही वर्षांत वंदे भारत गाड्यांवर भरपूर लक्ष केंद्रित केले आहे. वंदे भारत गाड्या एकामागून एक नवीन मार्गांवर सुरू होत आहेत. आता भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. वंदे भारत ट्रेन आणखी एका नवीन मार्गावर धावणार आहे. ही ट्रेन कर्नाटकातील बेळगावी ते पुणे दरम्यान धावणार आहे. केंद्र सरकारनेही यासाठी मान्यता दिली आहे. राज्यसभा खासदार आणि भाजप नेत्या इराणा काडादी यांनी ही माहिती दिली आहे.

आज लोकसभा निवडणूक झाली तर...; आजतक-सीव्होटरचा दुसरा सर्व्हे, मोदी खरेच ३७०+

वंदे भारत या नव्या मार्गावर धावण्याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काडादी यांना पत्र लिहून यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली आहे. मात्र, बेळगाव ते पुणे दरम्यान वंदे भारत कधी सुरू होईल याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. ही ट्रेन सुरू झाल्यामुळे प्रवाशांना कमी वेळेत पोहोचता येण्याबरोबरच व्यापार आणि पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास आहे. गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस पीएम मोदींनी पाच वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. अयोध्येतून सुरू झालेल्या या गाड्या आता विविध मार्गांवर धावू लागल्या आहेत.

देशात ८२ वंदे भारत गाड्या

वंदे भारत गाड्यांची संख्या ८२ पर्यंत वाढवली आहे आणि नवी दिल्ली-मुंबई आणि नवी दिल्ली-हावडा रेल्वेवर या गाड्यांचा वेग ताशी १६० किलोमीटरपर्यंत वाढवण्याचे काम सुरू आहे. वंदे भारत गाड्यांबाबत १० खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या लेखी उत्तरात रेल्वे मंत्र्यांनी ही माहिती दिली. ३१ जानेवारी, २०२४ पर्यंत, ८२ वंदे भारत गाड्या कार्यरत होत्या,रेल्वे मंत्री म्हणाले, "याशिवाय, गाड्या थांबवण्याची तरतूद आणि वंदे भारतसह नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची प्रक्रिया चालू आहे. 

टॅग्स :Vande Mataramवंदे मातरमrailwayरेल्वे