शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातांमागील कटाबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले, "प्रत्येकाला पकडू आणि तुरुंगात टाकू..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 13:59 IST

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी देशात दरवर्षी १७१ अपघात होत होते.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूर आणि राजस्थानातील अजमेर येथे रेल्वे अपघात घडवण्याचा मोठा कट रचण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रुळावर सिमेंटचा मोठा दगड ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. वारंवार समोर येणाऱ्या या घटनांनंतर आता भारतीय रेल्वे प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे.

याबाबत आता रेल्वेमंत्र्यांनीही इशारा दिला आहे. न्यूज १८ इंडियाच्या एका कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भाष्य केलं. यावेळी, ते म्हणाले की, मी त्यांना (कट रचणाऱ्यांना)  स्पष्टपणे चेतावणी देतो. असे करणाऱ्या प्रत्येकाला पकडू आणि तुरुंगात टाकू. कोणत्याही परिस्थितीत दररोज प्रवास करणाऱ्या देशातील दोन कोटी प्रवाशांचे आम्ही जबाबदारीने संरक्षण करू. प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणालाही खेळू देणार नाही. असा प्रत्येक प्रयत्न आपण हाणून पाडू शकतो, त्यामुळं आपण सतर्क राहायला हवे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी देशात दरवर्षी १७१ अपघात होत होते. मात्र, सध्याच्या घडीला ४० अपघात झाले आहेत. पण तरीही रात्रंदिवस मेहनत करून स्ट्रक्चर बदलण्यावर इतका भर दिला आहे की, ती ४० ची संख्याही आणखी कमी होईल. आगामी काळात आम्ही अधिक जबाबदारीनं काम करू आणि प्रवाशांची सुरक्षा आणखी सुनिश्चित करणार आहोत.

याचबरोबर, छठच्या दिवशी घरी जाणाऱ्या प्रवाशांना येणाऱ्या समस्यांबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, जितक्या ट्रेन चालवल्या जातात, त्या सर्व भरलेल्या असतात. रेल्वेची क्षमता वाढवली जाईल. भारताने एका वर्षात स्वित्झर्लंडइतके रेल्वे ट्रॅक जोडले. दरवर्षी सात हजार डबे बनवले जात आहेत. क्षमता वाढवण्यावर जास्त भर आहे. पुढील १० वर्ष लक्ष केंद्रित असून रेल्वेचा संपूर्ण कायापालट होईल.

टॅग्स :railwayरेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव