शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Railway Accident: रेल्वे कवच फेल? दोन मालगाड्या समोरसमोर आदळल्या; मोटरमन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 08:45 IST

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागात एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. 

सुलतानपूर : उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमध्ये दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. या अपघातात मालगाडीचा चालक जखमी झाला आहे. जवळपास अर्धा डझन डबे रुळावरून घसरले आहेत. दोन्ही मालगाड्यांचे इंजिन खराब झाले आहे.

या अपघातानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, रेल्वे अधिकाऱ्यांकडून दुरुस्ती करण्यात येत आहे. सुलतानपूर जंक्शनजवळ लखनऊ आणि वाराणसीहून येणाऱ्या दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक झाली. पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत मालवाहू गाड्यांचे इंजिन खराब झाले आहे. या घटनेनंतर लखनौ-वाराणसी-अयोध्या आणि प्रयागराज रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागात एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. 

काय आहे रेल्वे कवच...कवच' हे असे तंत्रज्ञान आहे ज्यामुळे दोन रेल्वे कधीच एकमेकांवर आदळणार नाहीत. ही जगातील सर्वात स्वस्त यंत्रणा आहे. रेल्वेला झिरो अॅक्सिडेंटचे लक्ष्य गाठायचे आहे. यासाठी आणि अपघातातील हानी टाळण्यासाठी कवच ही यंत्रणा बनविण्यात आली आहे. या तंत्राज्ञानामुळे जर या डिजिटल सिस्टिमला रेड सिग्नल किंवा अन्य कोणती नादुरुस्ती किंवा मानवी चूक दिसली तरी रेल्वे जागच्या जागी थांबते. एकदा का ही यंत्रणा लागू झाली की ती राबविण्यासाठी प्रती किमी ५० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. जगभरात यासाठी २ कोटी रुपये खर्च येतो. साधारण वर्षभरापूर्वी रेल्वेमंत्र्यांनी या यंत्रणेची चाचणी घेतली होती. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात