शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या संख्येत २५ टक्क्यांनी कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:04 IST

रेल्वे बोर्डातील अधिकाऱ्यांमध्ये २५ टक्क्यांनी कपात करून त्यांची संख्या २०० वरून १५० पर्यंत कमी करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला आहे.

नवी दिल्ली : रेल्वे बोर्डातील अधिकाऱ्यांमध्ये २५ टक्क्यांनी कपात करून त्यांची संख्या २०० वरून १५० पर्यंत कमी करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला आहे. अतिरिक्त ठरणाºया ५० अधिकाºयांच्या बदल्या झोनल रेल्वेमध्ये केल्या जातील. रेल्वे बोर्डाची पुनर्रचना करण्याची बराच काळ प्रलंबित असलेली योजना आता मार्गी लागणार आहे.

केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना २००० साली रेल्वे बोर्डाच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव पहिल्यांदा मांडण्यात आला होता. रेल्वे बोर्डाचा आकार आटोपशीर करण्यात यावा असा त्यामागे विचार होता. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, सध्या रेल्वे बोर्डामध्ये २०० अधिकारी आहेत. त्यांची संख्या १५०वर आणण्यात येईल.

अतिरिक्त ठरणाºया संचालक दर्जाच्या अधिकाºयांची झोनल रेल्वेमध्ये बदली केली जाईल. रेल्वे बोर्डामध्ये अनेक अधिकारी एकाच प्रकारचे काम करत असल्याचे निदर्शनास आले होते. झोनल रेल्वेची कार्यक्षमता वाढावी म्हणून तिथे वरिष्ठ अधिकारी असण्याची गरज होती. त्यादृष्टीनेही हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल.

भारतीय रेल्वेच्या कारभाराबद्दल नेमण्यात आलेल्या विवेक देब्रॉय समितीनेही २०१५ साली आपल्या अहवालात रेल्वे बोर्डाचा आकार आटोपशीर करण्याची सूचना केली होती. भारतीय रेल्वेचा कारभाराचे केंद्रीकरण झाले असून नोकरशाहीमुळे एकंदर कार्यसंस्कृतीवर परिणाम होत आहे. रेल्वे बोर्डात आवश्यकतेपेक्षा जास्त अधिकारीवर्ग असून त्यामुळे रेल्वेच्या कार्यक्षमतेवरही त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे या समितीने म्हटले होते.

हे तर पहिले पाऊल

सूत्रांनी सांगितले की, रेल्वे बोर्डाच्या कारभाराचे कठोर परीक्षण करून तेथील अधिकाºयांच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय इतक्या वर्षांत कधीच घेण्यात आला नव्हता. या बोर्डातील २०० अधिकाºयांमुळे रेल्वेच्या तिजोरीवर पडणाºया बोजाचा कोणीही विचार केला नव्हता. तशी राजकीय इच्छाशक्ती कोणी दाखविली नव्हती; पण आता रेल्वे खात्याने तसे पाऊल उचलले आहे. रेल्वेचा कारभार आमूलाग्र सुधारण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्यातील हे पहिले पाऊल आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे