शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

"राहुलजी 'शून्य' बघून घ्या... '०'!"; दिल्ली निवडणुकीतील काँग्रेसच्या '०' स्कोरवरून अनुराग ठाकुर यांचा निशाणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 00:16 IST

संसदेत बोलताना अनुराग ठाकूर यांनी एक छोटे पोस्टर दाखवले. त्यावर, १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर '०' कर, असे लिहिलेले होते.

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या खराब कामगिरीची सर्वत्र चर्चा होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही अर्थात काँग्रेसचा स्कोर 'शून्य' राहिला. यावरूनच आता भारतीय जनात पक्षाने काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसच्या या कामगिरीवर संसदेत व्यंग्यात्मक निशाणा साधला. त्यांनी काँग्रेसच्या राजवटीतील उच्च आय कर दरावर टीका केली आणि नवीन कर प्रणालीची तुलना करून ती सामान्य जनतेसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले.

संसदेत बोलताना अनुराग ठाकूर यांनी एक छोटे पोस्टर दाखवले. त्यावर, १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर '०' कर, असे लिहिलेले होते. ते म्हणाले की काँग्रेसला कदाचित हे 'शून्य' आवडणार नसेल. पण यामुळे कोट्यवधी सामान्य जनतेच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे. यावेळी राहुल गांधी यांच्या एका मीमचा उल्लेख करत ठाकूर म्हणाले, राहुलजी, जरा हे शून्य चेक करा. त्या मीममध्ये राहुल गांधींना फ्यूअल स्टेशन अटेंडन्ट म्हणून दाखवण्यात आले आहे. ते ड्रायव्हरला मीटरमध्ये 'शून्य' बघायला सांगत आहेत?

काँग्रेसच्या निवडणुकांतील कामगिरीवर प्रश्न - यावेळी अनुराग ठाकूर यांनी, काँग्रेसच्या गेल्या काही निवडणुकांतील खराब कामगिरीचाही उल्लेख केला. गेल्या काही निवडणुकांचा उल्लेख करत, त्या निवडणुकीत काँग्रेसने किती जागा जिंकल्या? असा प्रश्न अनुराग ठाकूर विचारत होते आणि प्रत्येक वेळी भाजपचे इतर खासदार "शून्य" म्हणत होते. ठाकूर पुढे म्हणाले, जर कोणी 'शून्या'च्या विक्रमाची यादी बनवली असेल तर ती काँग्रेस पक्षानेच बनवली आहे आणि हे राहुल गांधींच्या नेतृत्वात घडले आहे.

दिल्लीत काँग्रेसचा पराभव सुरूच -दिल्लीत १९९८ पासून सलग १५ वर्षे काँग्रेसचे सरकार होते. मात्र, २०१४ पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. याचा पाढाच ठाकुर यांनी संसदेत वाचला ते म्हणाले... २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या आणि २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या.

दिल्लीत भाजपचा ऐतिहासिक विजय -या निवडणुकीत भाजपने जवळजवळ तीन दशकांनंतर दिल्लीत शानदार पुनरागमन केले. दिल्लीतील ७० विधानसभा जागांपैकी भाजपला ४८ जागा, आपला २२ जागा, तर काँग्रेसला ० जागा मिळाल्या आहेत. 

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025