शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'अग्निवीर योजना अजीत डोभाल यांनी सैन्यावर लादली; यामुळे हिंसाचार वाढेल', राहुल गांधींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 15:39 IST

राहुल गांधींनी महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजना, गरिबी आणि अदानी या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला.

नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत भाषण करताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजना, गरिबी आणि अदानी या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, अग्निवीर योजना ही लष्कराची योजना नाही, असे भारत जोडो यात्रेदरम्यान लष्करी अधिकारी आणि माजी सैनिकांनी त्यांना सांगितले होते. 

राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा आम्ही तरुणांना त्यांच्या नोकऱ्यांबद्दल विचारले तेव्हा अनेकांनी सांगितले की ते बेरोजगार आहेत किंवा कॅब चालवतात. पीएम विमा योजनेंतर्गत पैसे न मिळाल्याबद्दल अनेक शेतकऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेतल्या गेल्या. आदिवासींनाही त्यांचा हक्क मिळाला नाही. अग्निवीर योजनेबद्दलही लोक बोलले. तरुणांनी सांगितले की, या योजनेमुळे फक्त 4 वर्षात नोकरी सोडावी लागणार आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, अनेक सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अग्निवीर योजना आरएसएस, गृह मंत्रालयाकडून आली आहे, लष्कराकडून नाही. अग्निवीर योजना लष्करावर लादली जात आहे. लोकांना शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे आणि नंतर त्यांना समाजात परत जाण्यास सांगितले जात आहे, यामुळे हिंसाचाराला उत्तेजन मिळेल. अग्निवीर योजना लष्कराकडून आली नाही आणि एनएसए अजित डोवाल यांनी ही योजना लष्करावर लादली, असे त्यांना (निवृत्त अधिकाऱ्यांना) वाटते, असेही राहुल म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAgneepath Schemeअग्निपथ योजनाBJPभाजपाIndian Armyभारतीय जवानGautam Adaniगौतम अदानी