शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयानं राफेल डीलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही- निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 19:05 IST

संरक्षणमंत्री सीतारामन यांची राहुल गांधींवर टीका

नवी दिल्ली: राफेल डील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढल्या आहे. यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केल्यावर आता भाजपानं त्यांना प्रत्युत्तर दिलं. आता सर्वोच्च न्यायालयदेखील म्हणतंय, चौकीदार चोर है अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींवर शरसंधान साधलं. राहुल यांचं हे विधान न्यायालयाचा अपमान करणारं असल्याचं संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं. राहुल गांधींनी न्यायालयाचं सुनावणीचा एकही परिच्छेद वाचला नसेल, असा टोलादेखील त्यांनी लगावला.सर्वोच्च न्यायालयानं याचिका स्वीकारली आहे. सर्वोच्च न्यायालयानं चौकीदार चोर है म्हटलं असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींचं हे विधान न्यायालयाचा अपमान करणारं आहे. जी व्यक्ती स्वत: जामिनावर आहे, सर्व राजकीय मर्यादांचं उल्लंघन करतेय, ती व्यक्ती अशा व्यक्तीवर आरोप करतेय, जिला न्यायालयानं काहीच म्हटलेलं नाही, अशी टीका सीतारामन यांनी केली. 'ज्या कागदपत्रांच्या आधारे पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या, ती कागदपत्रं कलम 123 नुसार पुरावे म्हणून मानली जाऊ शकत नाहीत. मोदी सरकारनं त्यामुळेच याचिकांना विरोध केला होता,' असं सीतारामन म्हणाल्या. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे. मोदी सरकारनं आक्षेप नोंदवलेली कागदपत्रं ग्राह्य धरण्यात येतील, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. त्यामुळे सरकारला मोठा धक्का बसला. राफेल डील प्रकरणाची दुसऱ्यांदा सुनावणी घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दर्शवली.  याप्रकरणी केंद्र सरकारनं घेतलेल्या पुराव्याच्या कागदपत्रांवरील आक्षेप फेटाळून लावला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. संजय कृष्ण कौल व न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठासमोर राफेल डील प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. तसंच, केंद्र सरकारनं घेतलेल्या पुराव्यांच्या कागदपत्रांवरील आक्षेप फेटाळून सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला. न्यायालयात सादर करण्यात आलेली कागदपत्रं वैध असल्याचं न्यायमूर्तींनी  म्हटलं.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन