शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राहुल गांधींच्या 'आरएसएस महिला शॉर्ट्स' वक्तव्यामुळे काँग्रेस अडचणीत ? गुजरात निवडणुकीत नुकसान होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 11:13 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात दौ-यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांच्या सहभागावर प्रश्न उपस्थित केला होता. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना सापत्नभावाची वागणूक मिळते, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता.

नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात दौ-यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांच्या सहभागावर प्रश्न उपस्थित केला होता. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना सापत्नभावाची वागणूक मिळते, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. आरएसएसच्या शाखांमध्ये हाफ पँटमध्ये कधी महिलांना कुणी बघितलं आहे का ? असा प्रश्न राहुल यांनी विचारला होता. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा वापर करत भाजपा महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करु शकतं. भाजपाच्या आक्रमक धोरणामुळे काँग्रेस पक्षाला नुकसान होण्याची शक्यता आहे. 

भाजपाने राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात कोणती रणनीती आखली आहे हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधींच्या हाफ पँटच्या वक्तव्यामुळे काँग्रेस चिंतित आहे. आरएसएसने राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्षेप घेत जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींचं वक्तव्य निराधार असल्याचं सांगत आरएसएसने आपली बाजू मांडली आहे. 

काँग्रेसचे माजी खासदार सत्यजीत गायकवाड यांनीदेखील राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे पक्षात थोडा अस्वस्थपणा असल्याचं कबूल केलं आहे. त्यांनी सांगितलं की, 'आरएसएसमध्ये महिलांना सहभागी केलं जात नाही हे सर्वांनाच माहित आहे. आरएसएसचे प्रचारक खासकरुन अविवाहित पुरुषच असतात, जे संघाच्या प्रचाराचं काम करत असतात'. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना स्थान नाही, या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेला राष्ट्रसेविका समितीतर्फे जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. राहुल गांधी हे काँग्रेसचे जबाबदार नेते असून, त्यांनी सखोल माहिती घेऊन बोलणे अपेक्षित आहे. राष्ट्रसेविका समितीची संघाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असून संघाबाबत राहुल गांधींचे अज्ञान दिसून आले आहे, या शब्दांत प्रमुख संचालिका शांताक्का यांनी टीका केली. 

गेल्या ८१ वर्षांपासून राष्ट्रसेविका समिती देशात कार्यरत आहे. स्वातंत्र्याअगोदरपासून सक्रिय असलेली ही देशातील एकमेव अखिल भारतीय महिला संघटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समकक्षच दर्जा देण्यात येतो व आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रेरणेतूनच मावशी केळकर यांनी समितीची स्थापना केली. संघ आणि राष्ट्र सेविका समिती हे बहीण-भावाप्रमाणे आहेत. संघाच्या दरवर्षी मार्च महिन्यात होणाºया अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत राष्ट्र सेविका समितीचा सहभाग असतो. तसेच परिवारातील विविध संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या महिला प्रतिनिधीदेखील संघाच्या निर्णय प्रक्रियेत निर्णायक भूमिका बजावतात. विशेष म्हणजे याला प्रसार माध्यमांकडूनदेखील प्रसिद्धी मिळते. अशास्थितीत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याकडून असे बेजबाबदार वक्तव्य अपेक्षित नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ