शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

राहुल गांधींना किती कळतं?; अरुण जेटलींचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 21:21 IST

राहुल गांधींच्या टीकेचा अरुण जेटलींकडून मुद्देसूद समाचार

नवी दिल्ली: मोदी सरकारवर तोफ डागणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अर्थमंत्री अरुण जेटलींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'राहुल गांधींना किती कळतं? त्यांना कधी समज येणार आहे? मध्य प्रदेशातील त्यांचं आजचं भाषण ऐकून माझ्या मनात हेच प्रश्न आले,' असं जेटलींनी फेसबुकवर लिहिलं आहे. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं राहुल यांनी मंदसौरमध्ये जाऊन मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतरच्या सभेत त्यांनी मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. या हल्ल्याला आता जेटलींनी प्रत्युत्तर दिलं आहे. अरुण जेटलींनी फेसबुकवर ब्लॉग लिहून राहुल गांधींच्या सर्व मुद्यांचा समाचार घेतला आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा, उद्योगपतींचं माफ करण्यात आलेलं कर्ज, बेरोजगारी या मुद्यांवरुन राहुल यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. या टीकेचा जेटलींनी मुद्देसूद प्रत्युत्तर दिलं आहे. 'सरकारनं उद्योगपतींचं एकाही रुपयाचं कर्ज माफ केलेलं नाही. राहुल गांधी चुकीची माहिती देत आहेत. बँकांची देणी थकवणाऱ्या उद्योगपतींना दिवाळखोर घोषित करण्यात आलं असून त्यांची कंपन्यांमधून हकालपट्टी करण्याचं काम मोदी सरकारनं केलं आहे. या उद्योगपतींना यूपीए सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात कर्जवाटप झालं होतं,' असं जेटलींनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. 

बुडित खात्यात गेलेल्या बँकांच्या कर्जावरुन राहुल गांधींनी केलेल्या टीकेलाही जेटलींनी उत्तर दिलं. 'बुडित खात्यात गेलेल्या कर्जाला यूपीए दोन सरकारचा कारभार जबाबदार आहे. सध्या मोदी सरकार कर्जाची वसुली करण्यास प्राधान्य देत आहे,' असं जेटलींनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. देशात मोबाईल निर्मिती केंद्रांची संख्या कमी असल्याच्या राहुल यांच्या टीकेलाही जेटलींनी प्रत्युत्तर दिला. '2014 मध्ये काँग्रेस सरकार सत्तेतून बाहेर गेलं, त्यावेळी देशात फक्त दोन मोबाईल निर्मिती केंद्रं होती. सध्याच्या घडीला देशात तब्बल 120 मोबाईल निर्मिती केंद्रं आहेत. यासाठी तब्बल 1 लाख 32 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे,' अशी आकडेवारी त्यांनी दिली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीArun Jaitleyअरूण जेटलीBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी