शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेससह संघविरोधी पक्षांसाठी आत्मघातकीच : लालू यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 14:34 IST

पराभवावर सर्वांनी मिळून मंथन करणे गरजेचे आहे. सर्वच्या सर्व विरोधीपक्ष भाजपला हटविण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु, संपूर्ण देशात या लोकांचा संदेश पोहचलाच नाही. त्यामुळे अपयश आल्याचे लालू यांनी विश्लेषणात म्हटले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या पक्षातील राजीनामा सत्र थांबण्याचं नाव घेत नाही. खुद्द पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीच पराभवाची जबाबदारी स्वीकारात राजीनामा दिला आहे. त्यामुळे इतर नेते देखील राजीनामा देत आहेत. परंतु, राहुल यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आपले मत मांडले आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय केवळ काँग्रेससाठी आत्मघातकी नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध लढा देणाऱ्या संघटना, संस्था आणि पक्षांसाठी घातक ठरेल, अस लालू यांनी म्हटले आहे. एका इंग्रजी दैनिकाने लोकसभा निवडणुकीचं लालू यांनी केलेलं विश्लेषण प्रसिद्ध केले आहे. त्यात हा दावा करण्यात आला आहे.

विश्लेषणात लालू म्हणाले की, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणे म्हणजे भाजपच्या जाळ्यात फसण्यासारखे आहे. गांधी घराण्याव्यतिरिक्त कोणीही अध्यक्ष झाल्यास त्याला नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची ब्रिगेड गांधी घराण्याचं बाहुलं म्हणतील. या मुद्दावर भाजप पुढची निवडणूक लढवेल, त्यामुळे राहुल यांनी आपल्या विरोधकांना असं कऱण्याची संधी देऊ नये, असंही लालू यांनी म्हटले आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीतील पराभव हा विरोधकांचा सामूहिक पराभव आहे. त्यामुळे यावर सर्वांनी मिळून मंथन करणे गरजेचे आहे. सर्वच्या सर्व विरोधीपक्ष भाजपला हटविण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु, संपूर्ण देशात या लोकांचा संदेश पोहचलाच नाही. त्यामुळे अपयश आल्याचे लालू यांनी विश्लेषणात म्हटले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव