शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेससह संघविरोधी पक्षांसाठी आत्मघातकीच : लालू यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 14:34 IST

पराभवावर सर्वांनी मिळून मंथन करणे गरजेचे आहे. सर्वच्या सर्व विरोधीपक्ष भाजपला हटविण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु, संपूर्ण देशात या लोकांचा संदेश पोहचलाच नाही. त्यामुळे अपयश आल्याचे लालू यांनी विश्लेषणात म्हटले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या पक्षातील राजीनामा सत्र थांबण्याचं नाव घेत नाही. खुद्द पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीच पराभवाची जबाबदारी स्वीकारात राजीनामा दिला आहे. त्यामुळे इतर नेते देखील राजीनामा देत आहेत. परंतु, राहुल यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आपले मत मांडले आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय केवळ काँग्रेससाठी आत्मघातकी नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध लढा देणाऱ्या संघटना, संस्था आणि पक्षांसाठी घातक ठरेल, अस लालू यांनी म्हटले आहे. एका इंग्रजी दैनिकाने लोकसभा निवडणुकीचं लालू यांनी केलेलं विश्लेषण प्रसिद्ध केले आहे. त्यात हा दावा करण्यात आला आहे.

विश्लेषणात लालू म्हणाले की, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणे म्हणजे भाजपच्या जाळ्यात फसण्यासारखे आहे. गांधी घराण्याव्यतिरिक्त कोणीही अध्यक्ष झाल्यास त्याला नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची ब्रिगेड गांधी घराण्याचं बाहुलं म्हणतील. या मुद्दावर भाजप पुढची निवडणूक लढवेल, त्यामुळे राहुल यांनी आपल्या विरोधकांना असं कऱण्याची संधी देऊ नये, असंही लालू यांनी म्हटले आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीतील पराभव हा विरोधकांचा सामूहिक पराभव आहे. त्यामुळे यावर सर्वांनी मिळून मंथन करणे गरजेचे आहे. सर्वच्या सर्व विरोधीपक्ष भाजपला हटविण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु, संपूर्ण देशात या लोकांचा संदेश पोहचलाच नाही. त्यामुळे अपयश आल्याचे लालू यांनी विश्लेषणात म्हटले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव