शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

राहुल गांधींचा नवा लूक सद्दाम हुसैनसारखा वाटतो? गडकरींनी दिलं नेहरुंचं उदाहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 15:01 IST

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या दाढीची तुलना इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनशी केली होती

नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे. भाजपच्या या यशानंतर काँग्रेसच्या मानहानीकारण पराभवाचीची चर्चा रंगली आहे. त्यासोबतच, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेलाही जोडलं जात आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये असून यात्रेतील घडामोडींची आणि राहुल गांधींच्या लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी या लूकवरुन आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी हे सद्दाम हुसेनसारखे दिसायला लागलेत, असे विधान केले होते. यालाच धरुन केंद्रीयमंत्री नितीन गडकरींना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, त्यांनी मी माझ्या कामाकडे लक्ष देतो, असे म्हटले.  

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या दाढीची तुलना इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनशी केली होती. मात्र, टिका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. मी एवढेच म्हणालो की जर तुम्हाला सद्दामसोबत बसवले तर तुम्हालाही तसेच वाटेल. पण तुम्ही दाढी काढलीत तर तुम्ही नेहरूंसारखे दिसाल, मात्र, त्यांच्या या तुलनात्मक विधानाची चर्चा सोशल मीडियासह माध्यमांतही दिसून आली. त्यावरुनच, आता आज तकच्या एका कार्यक्रमात नितीन गडकरींना हाच प्रश्न विचारण्यात आला. आपल्याच मुख्यमंत्र्यांनी अशी तुलना केली होती, आपणास काय वाटतं? त्यावर गडकरींनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. 

मी या वादविवादात पडू इच्छित नाही, मला वाटतं की ते विरोधी पक्षात आहेत. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी सत्तारुढ पक्षाची जेवढी गरज आहे, तेवढीच विरोधी पक्षाच्या मजबुतीचीही आवश्यकता आहे. मी कालच युट्यूबवर अटलबिहारी वाजपेयी याचं भाषण ऐकत होतो. त्यामध्ये, अटलबिहारी वाजपेयी यांनी पंडित नेहरुंची तुलना जगातील दोन अशा नेत्यांसोबत केली होती, त्यावरुन संसदेत गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, हा वाद झाल्यानंतरही रात्री जेव्हा नेहरुजी मला भेटले, तेव्हा त्यांनी माझ्या भाषणाचं कौतुक केलं. म्हणजे, टीका करणे हा विरोधी पक्षांचा अधिकार असतो, राहुल गांधी हे सध्या विरोधी पक्षात आहेत, त्यांचा पक्ष विपक्ष आहे. त्यामुळे, विरोधी पक्ष म्हणून त्यांनी चांगलं काम करायला हवं, असे उत्तर नितीन गडकरी यांनी दिले. तसेच, प्रत्येकाला मेहनत करण्याचा अधिकार आहे, जेवढी ताकद आहे, तेवढी पणाला लावू द्यात. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे, जो सरस ठरेल तो पुढे जाईल, असेही भारत जोडो यात्रेबद्दल बोलताना गडकरींनी म्हटले.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा