शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

राहुल गांधींचा नवा लूक सद्दाम हुसैनसारखा वाटतो? गडकरींनी दिलं नेहरुंचं उदाहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 15:01 IST

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या दाढीची तुलना इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनशी केली होती

नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे. भाजपच्या या यशानंतर काँग्रेसच्या मानहानीकारण पराभवाचीची चर्चा रंगली आहे. त्यासोबतच, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेलाही जोडलं जात आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये असून यात्रेतील घडामोडींची आणि राहुल गांधींच्या लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी या लूकवरुन आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी हे सद्दाम हुसेनसारखे दिसायला लागलेत, असे विधान केले होते. यालाच धरुन केंद्रीयमंत्री नितीन गडकरींना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, त्यांनी मी माझ्या कामाकडे लक्ष देतो, असे म्हटले.  

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या दाढीची तुलना इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनशी केली होती. मात्र, टिका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. मी एवढेच म्हणालो की जर तुम्हाला सद्दामसोबत बसवले तर तुम्हालाही तसेच वाटेल. पण तुम्ही दाढी काढलीत तर तुम्ही नेहरूंसारखे दिसाल, मात्र, त्यांच्या या तुलनात्मक विधानाची चर्चा सोशल मीडियासह माध्यमांतही दिसून आली. त्यावरुनच, आता आज तकच्या एका कार्यक्रमात नितीन गडकरींना हाच प्रश्न विचारण्यात आला. आपल्याच मुख्यमंत्र्यांनी अशी तुलना केली होती, आपणास काय वाटतं? त्यावर गडकरींनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. 

मी या वादविवादात पडू इच्छित नाही, मला वाटतं की ते विरोधी पक्षात आहेत. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी सत्तारुढ पक्षाची जेवढी गरज आहे, तेवढीच विरोधी पक्षाच्या मजबुतीचीही आवश्यकता आहे. मी कालच युट्यूबवर अटलबिहारी वाजपेयी याचं भाषण ऐकत होतो. त्यामध्ये, अटलबिहारी वाजपेयी यांनी पंडित नेहरुंची तुलना जगातील दोन अशा नेत्यांसोबत केली होती, त्यावरुन संसदेत गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, हा वाद झाल्यानंतरही रात्री जेव्हा नेहरुजी मला भेटले, तेव्हा त्यांनी माझ्या भाषणाचं कौतुक केलं. म्हणजे, टीका करणे हा विरोधी पक्षांचा अधिकार असतो, राहुल गांधी हे सध्या विरोधी पक्षात आहेत, त्यांचा पक्ष विपक्ष आहे. त्यामुळे, विरोधी पक्ष म्हणून त्यांनी चांगलं काम करायला हवं, असे उत्तर नितीन गडकरी यांनी दिले. तसेच, प्रत्येकाला मेहनत करण्याचा अधिकार आहे, जेवढी ताकद आहे, तेवढी पणाला लावू द्यात. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे, जो सरस ठरेल तो पुढे जाईल, असेही भारत जोडो यात्रेबद्दल बोलताना गडकरींनी म्हटले.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा