शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

नाणारवासीयांच्या संघर्षाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 22:07 IST

नाणार प्रकल्पविरोधी समितीच्या शिष्टमंडळाने शनिवारी (28 एप्रिल) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची यांची भेट घेतली.

नवी दिल्ली - रत्नागिरीतील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाविरोधात संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. ग्रामस्थांच्या प्रखर संघर्षाबद्दल सहानुभूती व्यक्त करत प्रकल्पाकरिता सुपीक व भरपूर उत्पन्न देणा-या जमिनी का घेतल्या जात आहेत? असा संतप्त सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

शनिवारी (28 एप्रिल) नाणार रिफायनरीविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आणि आपल्या गेल्या अनेक दिवसांच्या संघर्षाबद्दल काँग्रेस अध्यक्षांना अवगत केले. सायंकाळी ६ ते ६.३० वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षांनी या प्रकल्पाला होणा-या विरोधाची आणि कारणांची सखोल माहिती घेतली. प्रकल्प विरोधी कृती समितीचे अध्यक्ष अशोक वालम व इतर सदस्यांनी याबद्दलची पार्श्वभूमी स्पष्ट करताना सदर गावांत जवळपास आंबे, काजू, नारळ, सुपारी, साग, बांबू इत्यादींची सहा कोटी झाडे असून सभोवती पश्चिम घाटाचा भाग देखील येतो हे सांगितले तसेच या प्रकल्पामुळे ५० हजार लोक विस्थापित होणार असून मच्छिमारांसहीत बागायतदारांचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे.

त्याचबरोबर सदर प्रकल्प हा पर्यावरणासाठी घातक आहे असेही सांगितले. यासंदर्भात काँग्रेस अध्यक्षांनी सुपीक जमीन का घेतली जात आहे? असे म्हणत या प्रकल्पाला होणा-या विरोधाला पाठिंबा दर्शवला. शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष आम्हाला फसवत असून राज्य सरकार जनतेच्या भावनांशी खेळत आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले त्यावर राहुल गांधी यांनी तात्काळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना सदर प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्याची सूचना केली त्यानुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण 2 मे रोजी नाणार येथे जाणार असून ते स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.

ग्रामस्थांनी राहुल गांधी यांना कोकणात येण्याचे निमंत्रण दिले आणि  तुम्हीच ही लढाई लढू शकता असा विश्वास व्यक्त केला. यासंदर्भात राहुल गांधी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.  

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी