शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर बलात्कार-मर्डर प्रकरणावरून काँग्रेस-TMC आमने सामने, राहुल गांधींच्या 'त्या' विधानावरून राजकारण तापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 09:33 IST

टीएमसीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर निशाणा साधत, राहुल गांधी सिद्धरामय्या यांचा राजीनामा मागणार का? असा सवाल केला आहे. 

कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाने जबरदस्त राजकारण पेटले आहे.  राहुल गांधी यांनी 'कठुआ ते कोलकाता' विधान करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. यावर तीन दिवसांनंतर, आता तृणमूलनेही राहुल गांधींवर पलटवार केला आहे. टीएमसीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर निशाणा साधत, राहुल गांधी सिद्धरामय्या यांचा राजीनामा मागणार का? असा सवाल केला आहे. 

I.N.D.I.A. ब्लॉकमधील बहुतांश पक्षांनी न्यायाची मागणी करत या प्रकरणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उचललेल्या पावलांचे समर्थन केले आहे. मात्र याप्रकरणी राहुल गांधींनी यांनी टीएमसीवर निशाणा साधला आहे. "पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे," असे राहुल गांधी यांनी म्हटे आहे.

कुणाल घोष यांचा राहुल गांधींवर पलटवार -कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गहलोत यांनी कथित जमीन वाटप घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. हाच धागा पकडत, एका बातमीचा फोटो पोस्ट करत, तृणमूलचे माजी राज्यसभा खासदार कुणाल घोष यांनी एक्सवर लिहिले, 'तर, राहुल गांधी जी, आपण आपल्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागणार का? हा भ्रष्टाचाराचा एक मोठा आरोप आहेत. पश्चिम बंगालमधील घटनेच्या खऱ्या माहितीशिवाय, ममता बॅनर्जी यांनी उचललेल्या पावलांची माहिती नसताना, आपण सोशल मीडियावर भाष्य केले आहे. आता, आपण आपल्या मुख्यमंत्र्यासंदर्भात पावले उचलण्याची कृपा कराला?" 

काय म्हणाले होते राहुल गांधी? -राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते, "कोलकाता येथे एका ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. ज्याप्रकारे तिच्यासोबत क्रूर आणि अमानवी कृत्य घडले, त्यामुळे डॉक्टर आणि महिला वर्गात असुरक्षिततेचे वातावरण आहे. पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न, रुग्णालय आणि स्थानिक प्रशासनावर  प्रश्न निर्माण करतो." या घटनेने विचार करायला भाग पाडले आहे की, मेडिकल कॉलेजसारख्या ठिकाणी डॉक्टरच सुरक्षित नसतील, तर पालकांनी कुठल्या भरवशावर आपल्या मुलींना बाहेर शिकायला पाठवायचे? निर्भया प्रकरणानंतर बनवलेले कडक कायदेही असे गुन्हे रोखण्यात अयशस्वी का आहेत?"

"हाथरस ते उन्नाव आणि कठुआ ते कोलकात्यापर्यंत महिलांवरील वाढत्या घटनांवर प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक घटकाला एकत्रितपणे गांभीर्याने चर्चा करून ठोस उपाययोजना कराव्या लागतील. या असह्य दु:खात मी पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे. त्यांना प्रत्येक परिस्थितीत न्याय मिळाला पाहिजे आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे" असेही राहुल गांधी यांनी म्हटले होते.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जीdoctorडॉक्टरcongressकाँग्रेसTrinamool Congressतृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगाल