शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांची ‘दिल की बात’, मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 07:23 IST

राहुल गांधी यांनी विदेश धोरण, आर्थिक धोरणासाठी मोदी सरकारला जबाबदार ठरविले. अमेरिकेसोबतच्या भारताच्या संबंधाला ते राजनैतिक भागीदारी मानतात.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’च्या धर्तीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शुक्रवारी ‘दिल की बात’ केली. यात त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आणि हे सांगण्याचा प्रयत्न केला की, चीनने भारताविरुद्ध मोर्चा उघडण्यासाठी हीच वेळ का निवडली?

राहुल गांधी यांनी विदेश धोरण, आर्थिक धोरणासाठी मोदी सरकारला जबाबदार ठरविले. अमेरिकेसोबतच्या भारताच्या संबंधाला ते राजनैतिक भागीदारी मानतात. रशिया आणि युरोपीय देशांसोबतच्या भारताच्या संबंधांचा उल्लेख करून ते सहयोगी असल्याचे सांगितले; पण अमेरिकेसोबतचे संबंध हे देण्या-घेण्यावर आधारित असल्याचे सांगत स्पष्ट केले की, याला वास्तविक सहकार्याचे संबंध समजणे मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाची चूक ठरेल. नेपाळ, भूतान, श्रीलंका हे भारताचे मित्र होते. ते आज कुठे आहेत? राहुल गांधी यांचा थेट आरोप होता की, मोदी सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे या देशांशी संबंध बिघडले आहेत.

देशाच्या बिघडलेल्या अर्थव्यवस्थेसाठी त्यांनी मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ते म्हणाले की, ५० वर्षांत भारताने ज्या प्रकारे आपला आर्थिक कणा मजबूत केला आहे, तो मोदी यांनी एका झटक्यात तोडला आहे. बेरोजगारी वाढली आहे. लघु उद्योग बंद होत आहेत. महागाई वाढली आहे. परिणामी, लोकांचा विश्वास संपला आहे. याचा फायदा चीनने उठविला आहे. आर्थिक संकट, चुकीचे परराष्ट्र धोरण, शेजाऱ्यांशी बिघडलेले संबंध यामुळेच चीनने ही वेळ निवडून भारताविरुद्ध मोर्चा उघडला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस