शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

राहुल गांधी यांची ‘दिल की बात’, मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 07:23 IST

राहुल गांधी यांनी विदेश धोरण, आर्थिक धोरणासाठी मोदी सरकारला जबाबदार ठरविले. अमेरिकेसोबतच्या भारताच्या संबंधाला ते राजनैतिक भागीदारी मानतात.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’च्या धर्तीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शुक्रवारी ‘दिल की बात’ केली. यात त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आणि हे सांगण्याचा प्रयत्न केला की, चीनने भारताविरुद्ध मोर्चा उघडण्यासाठी हीच वेळ का निवडली?

राहुल गांधी यांनी विदेश धोरण, आर्थिक धोरणासाठी मोदी सरकारला जबाबदार ठरविले. अमेरिकेसोबतच्या भारताच्या संबंधाला ते राजनैतिक भागीदारी मानतात. रशिया आणि युरोपीय देशांसोबतच्या भारताच्या संबंधांचा उल्लेख करून ते सहयोगी असल्याचे सांगितले; पण अमेरिकेसोबतचे संबंध हे देण्या-घेण्यावर आधारित असल्याचे सांगत स्पष्ट केले की, याला वास्तविक सहकार्याचे संबंध समजणे मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाची चूक ठरेल. नेपाळ, भूतान, श्रीलंका हे भारताचे मित्र होते. ते आज कुठे आहेत? राहुल गांधी यांचा थेट आरोप होता की, मोदी सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे या देशांशी संबंध बिघडले आहेत.

देशाच्या बिघडलेल्या अर्थव्यवस्थेसाठी त्यांनी मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ते म्हणाले की, ५० वर्षांत भारताने ज्या प्रकारे आपला आर्थिक कणा मजबूत केला आहे, तो मोदी यांनी एका झटक्यात तोडला आहे. बेरोजगारी वाढली आहे. लघु उद्योग बंद होत आहेत. महागाई वाढली आहे. परिणामी, लोकांचा विश्वास संपला आहे. याचा फायदा चीनने उठविला आहे. आर्थिक संकट, चुकीचे परराष्ट्र धोरण, शेजाऱ्यांशी बिघडलेले संबंध यामुळेच चीनने ही वेळ निवडून भारताविरुद्ध मोर्चा उघडला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस