शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

महिला अत्याचाराविरोधात सरकारनं कडक पावलं उचलावीत- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 01:02 IST

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज कठुआ आणि उन्नाव बलात्कार घटनांच्या निषेधार्थ इंडिया गेटजवळ कँडल मार्च काढला आहे.

नवी दिल्ली- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्यरात्री कठुआ-उन्नाव बलात्कार घटनांच्या निषेधार्थ इंडिया गेटजवळ कँडल मार्च काढला. राहुल गांधींच्या या कँडल मार्चमध्ये अशोक गेहलोत, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद आणि दिग्विजय सिंह, अंबिका सोनी, गुलाम नबी आझाद, नफीसा सोनी सारखे काँग्रेसचे दिग्गज नेतेही सहभागी झालेत. मानसिंग रोडपासून इंडिया गेटपर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. तसेच प्रियंका गांधी वढेरा यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते राहुल गांधींच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरले. निर्भयाचे आईवडीलही या मोर्चात सहभागी झालेत. मध्यरात्री काढलेल्या या मार्चमध्ये काही कार्यकर्त्यांमध्ये अचानक गोंधळ उडाला आणि प्रियांका गांधींसह महिलांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटनाही घडली. काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र काही जण सेल्फी काढण्यात मग्न असल्याचेही दिसून आले. निर्भया बलात्काराच्या घटनेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत एवढ्या मोठ्या प्रमाणात कँडल मार्च निघाल्याचे दिसून आले.महिलांवर होणारे अत्याचार हा राजकीय विषय नसून राष्ट्रीय विषय झालाय. रस्त्यावर उतरलेल्या जनक्षोभाकडे पाहून तुम्हाला हे समजलंच असेल. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे. महिला अत्याचाराविरोधात सरकारनं कडक पावलं उचलावीत, अशी आमची अपेक्षा असल्याचं राहुल गांधी यांनी कँडल मार्चवेळी सांगितले.कँडल मार्चसंदर्भातील अपडेट्स- राहुल गांधी कँडल मार्चच्या ठिकाणावरून गेल्यानंतर गर्दी ओसरली- राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कँडल मार्चच्या ठिकाणावरून पुन्हा निवासस्थानाकडे परतले- प्रियंका गांधी आणि महिलांना काँग्रेस कार्यकर्त्यांची धक्काबुक्की- पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना थांबवल्यानंतर ते जमिनीवर बसले- नफिसा अली, अंबिका सोनी, शोभा ओझा यांच्यासह शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते मोर्च्यात सहभागी झालेत. - राहुल गांधींनी हा कार्यक्रम तयार केला, प्रियंका गांधीही या मोर्चात सहभागी- इंडिया गेटवरच्या कँडल मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश - काँग्रेसच्या ऑफिसमधून कँडल मार्चला सुरुवातझोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी आम्ही हा कँडल मार्च काढला. पंतप्रधान बेटी पढाओ, बेटी बचावच्या घोषणा देत असतात. परंतु त्यांच्याच राज्यात मुलींवर अत्याचार होत आहेत. आरोपींना वाचवणा-या त्यांच्या मंत्र्यांविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतीही कारवाई करत नाही, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला. राहुल गांधींनी या कँडल मार्चसंदर्भात गेल्या काही वेळापूर्वी ट्विटरद्वारे माहिती दिली होती. ते म्हणाले होते. उन्नाव-कठुआ बलात्कार प्रकरणामुळे इतरांप्रमाणे मलाही अतीव दुःख झाले. महिलांशी अशा प्रकारचं गैरवर्तन सहन केलं जाणार नाही. या बलात्काराच्या निषेधार्थ मी इंडिया गेटवर कँडल मार्च काढणार आहे. तुम्हीही माझ्यासोबत सहभागी व्हा, असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं होतं. उन्नाव-कठुआ बलात्कारप्रकरणी राहुल गांधींनी नरेंद्र मोदींनाही लक्ष केलं होतं. तसेच या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकारात कोणी दोषी व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न कसा काय करू शकतो?, अशा प्रश्न विचारत मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. अशा विकृत लोकांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी, असंही म्हणत राहुल गांधींनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला होता. तुम्हीही माझ्यासोबत सहभागी व्हा राहुल गांधींच्या या आवाहनाला दिल्लीतील जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. हजारो तरुण-तरुणी या मार्चमध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील काँग्रेस कार्यकर्तेही इंडिया गेटवर यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीUnnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण