शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

निलंबनाच्या कारवाईविरोधात राहुल गांधींचे आंदोलन, व्यंकैय्या नायडूंनी दिला स्पष्ट नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 13:07 IST

राज्यसभेचे सभापती व्यंकैय्या नायडू यांनी पुन्हा एकदा खासदारांवर केलेली निलंबनाची कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली:संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. सत्राच्या सुरुवातीलाच सभागृहात मोठ्या प्रमाणात गदारोळ पाहायला मिळाला. विरोधकांनी आजही राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. निलंबन मागे घेण्यासाठी विरोधकांनी संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले. या आंदोलनात राहुल गांधीदेखील सहभागी झाले होते.

खासदारांनी माफी मागावी-व्यंकैय्या नायडूदरम्यान, राज्यसभेचे सभापती व्यंकैय्या नायडू यांनी पुन्हा एकदा खासदारांवर केलेली निलंबनाची कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षाने संसदेचे सत्रात गदारोळ घालू नये, ही निलंबनाची पहिलीच वेळ नसून, याआधी देखील निलंबन करण्यात आले असल्याचे सभापती म्हणाले. तसेच, निलंबित खासदारांनी राज्यसभेत माफी मागावी त्यानंतरच त्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल असे देखील नायडू म्हणाले.

विरोधकांच्या आंदोलनात राहुल गांधींचा सहभागराज्यसभेच्या 12 सदस्यांना निलंबित केल्यानंतर विरोधी पक्षाने जोरदार आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. त्या आंदोलनात काँग्रेस नेते राहुल गांधी देखील सहभागी झाले होते. यावेळी सर्व नेत्यांनी हाताला काळी पट्टी बांधत निलंबनाच्या कारवाईचा निषेध केला. तसेच माफी मागणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

विरोधकांचा सभात्यागराज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपसभापती हरिवंश यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली. परवानगी न मिळाल्याने काँग्रेस खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, आरजेडी, टीआरएस आणि आययूएमएलनेही राज्यसभेतून सभात्याग केला.

पावसाळी अधिवेशनातील कृत्यामुळे निलंबनसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेच्या 12 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी(11 ऑगस्ट) केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबन झालेल्या खासदारांमध्ये एल्माराम करीम (माकप), फुल्लो देवी नेताम (काँग्रेस), छाया वर्मा (काँग्रेस), रिपून बोरा (काँग्रेस), बिनॉय बिस्वाम (सीपीआय), राजमणी पटेल (काँग्रेस), डोला सेन (तृणमूल काँग्रेस), शांत छेत्री (तृणमूल काँग्रेस), सय्यद नासीर हुसेन (काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना), अनिल देसाई (शिवसेना) आणि अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस) यांचा समावेश आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूParliamentसंसद