शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

निलंबनाच्या कारवाईविरोधात राहुल गांधींचे आंदोलन, व्यंकैय्या नायडूंनी दिला स्पष्ट नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 13:07 IST

राज्यसभेचे सभापती व्यंकैय्या नायडू यांनी पुन्हा एकदा खासदारांवर केलेली निलंबनाची कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली:संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. सत्राच्या सुरुवातीलाच सभागृहात मोठ्या प्रमाणात गदारोळ पाहायला मिळाला. विरोधकांनी आजही राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. निलंबन मागे घेण्यासाठी विरोधकांनी संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले. या आंदोलनात राहुल गांधीदेखील सहभागी झाले होते.

खासदारांनी माफी मागावी-व्यंकैय्या नायडूदरम्यान, राज्यसभेचे सभापती व्यंकैय्या नायडू यांनी पुन्हा एकदा खासदारांवर केलेली निलंबनाची कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षाने संसदेचे सत्रात गदारोळ घालू नये, ही निलंबनाची पहिलीच वेळ नसून, याआधी देखील निलंबन करण्यात आले असल्याचे सभापती म्हणाले. तसेच, निलंबित खासदारांनी राज्यसभेत माफी मागावी त्यानंतरच त्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल असे देखील नायडू म्हणाले.

विरोधकांच्या आंदोलनात राहुल गांधींचा सहभागराज्यसभेच्या 12 सदस्यांना निलंबित केल्यानंतर विरोधी पक्षाने जोरदार आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. त्या आंदोलनात काँग्रेस नेते राहुल गांधी देखील सहभागी झाले होते. यावेळी सर्व नेत्यांनी हाताला काळी पट्टी बांधत निलंबनाच्या कारवाईचा निषेध केला. तसेच माफी मागणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

विरोधकांचा सभात्यागराज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपसभापती हरिवंश यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली. परवानगी न मिळाल्याने काँग्रेस खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, आरजेडी, टीआरएस आणि आययूएमएलनेही राज्यसभेतून सभात्याग केला.

पावसाळी अधिवेशनातील कृत्यामुळे निलंबनसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेच्या 12 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी(11 ऑगस्ट) केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबन झालेल्या खासदारांमध्ये एल्माराम करीम (माकप), फुल्लो देवी नेताम (काँग्रेस), छाया वर्मा (काँग्रेस), रिपून बोरा (काँग्रेस), बिनॉय बिस्वाम (सीपीआय), राजमणी पटेल (काँग्रेस), डोला सेन (तृणमूल काँग्रेस), शांत छेत्री (तृणमूल काँग्रेस), सय्यद नासीर हुसेन (काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना), अनिल देसाई (शिवसेना) आणि अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस) यांचा समावेश आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूParliamentसंसद