शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

राहुल गांधींची ४५ दिवसांत १,२१५ किमींची पायपीट, लवकरच महाराष्ट्रात पहिलं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 11:19 IST

केंद्रातील मोदी सरकारविरोधात देशातील सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करत राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील ११ राज्यांतून भारत जोडो यात्रा पूर्ण करण्याचा संकल्प केला असून आजमित्तीस ते कर्नाटकात यात्रा करत आहेत. कर्नाटकच्या रायचूरमधील येरागेरा गावातून आज पुन्हा त्यांची भारत जोडो यात्रा सुरु झाली असून आज कर्नाटकातील त्यांच्या यात्रेचं शेवटचं पाऊल असणार आहे. त्यानंतर, उद्या म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी ही यात्रा तेलंगणात पहिलं पाऊल ठेवेल आणि लवकरच महाराष्ट्रातूनही या यात्रेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या यात्रेला लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून दक्षिण भारतातही राहुल गांधींचं ठिकठिकाणी स्वागत झाल्याचं पाहायला मिळालं. 

केंद्रातील मोदी सरकारविरोधात देशातील सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करत राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे. ही यात्रा दिवाळीनंतर महाराष्ट्रात येणार आहे. या 'भारत जोडो यात्रे'त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेऊन निमंत्रण दिले होते, त्यांनी काँग्रेसचे हे निमंत्रण स्वीकारले आहे. 

कन्याकुमारी ते काश्मीर अशा एकूण ३५७० किमीचा प्रवास करणारी ही भारत जोडो यात्रा आहे. ७ सप्टेंबर रोजी राहुल गांधींनी या यात्रेला सुरुवात केली असून आत्तापर्यंत त्यांनी १२१५ किमीचा प्रवास पूर्ण केला आहे. कर्नाटकात आज यात्रेचं शेटवटचं पाऊल असून यापूर्वी तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यातून राहुल गांधींनी पायी प्रवास केला आहे. आता, तेलंगणात त्यांची एन्ट्री होणार असून त्यानंतर महाराष्ट्रात यात्रेचं पाऊल पडणार आहे. यात्रेचा आज ४५ वा दिवस आहे. 

तेलंगणातून या यात्रेचं महाराष्ट्रात आगमन होणार आहे. महाराष्ट्रात राहुल गांधींच्या स्वागतासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार हजर असणार आहेत. राहुल गांधींसमेवत ते व्यासपीठावरही दिसून येतील. आंध्र प्रदेशात राहुल गांधींना कामगार आणि शेतकरी वर्गाचा चांगला पाठिंबा मिळाल्याचं दिसून आलं. 

लवकरच महाराष्ट्रात

 राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रात साधारणतः सहा नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. या यात्रेचा राज्यातील प्रवास नांदेड जिल्ह्यातील देलगूर तालुक्यातून होणार असल्याचे माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकTelanganaतेलंगणा