शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

राहुल गांधींची ४५ दिवसांत १,२१५ किमींची पायपीट, लवकरच महाराष्ट्रात पहिलं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 11:19 IST

केंद्रातील मोदी सरकारविरोधात देशातील सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करत राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील ११ राज्यांतून भारत जोडो यात्रा पूर्ण करण्याचा संकल्प केला असून आजमित्तीस ते कर्नाटकात यात्रा करत आहेत. कर्नाटकच्या रायचूरमधील येरागेरा गावातून आज पुन्हा त्यांची भारत जोडो यात्रा सुरु झाली असून आज कर्नाटकातील त्यांच्या यात्रेचं शेवटचं पाऊल असणार आहे. त्यानंतर, उद्या म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी ही यात्रा तेलंगणात पहिलं पाऊल ठेवेल आणि लवकरच महाराष्ट्रातूनही या यात्रेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या यात्रेला लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून दक्षिण भारतातही राहुल गांधींचं ठिकठिकाणी स्वागत झाल्याचं पाहायला मिळालं. 

केंद्रातील मोदी सरकारविरोधात देशातील सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करत राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे. ही यात्रा दिवाळीनंतर महाराष्ट्रात येणार आहे. या 'भारत जोडो यात्रे'त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेऊन निमंत्रण दिले होते, त्यांनी काँग्रेसचे हे निमंत्रण स्वीकारले आहे. 

कन्याकुमारी ते काश्मीर अशा एकूण ३५७० किमीचा प्रवास करणारी ही भारत जोडो यात्रा आहे. ७ सप्टेंबर रोजी राहुल गांधींनी या यात्रेला सुरुवात केली असून आत्तापर्यंत त्यांनी १२१५ किमीचा प्रवास पूर्ण केला आहे. कर्नाटकात आज यात्रेचं शेटवटचं पाऊल असून यापूर्वी तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यातून राहुल गांधींनी पायी प्रवास केला आहे. आता, तेलंगणात त्यांची एन्ट्री होणार असून त्यानंतर महाराष्ट्रात यात्रेचं पाऊल पडणार आहे. यात्रेचा आज ४५ वा दिवस आहे. 

तेलंगणातून या यात्रेचं महाराष्ट्रात आगमन होणार आहे. महाराष्ट्रात राहुल गांधींच्या स्वागतासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार हजर असणार आहेत. राहुल गांधींसमेवत ते व्यासपीठावरही दिसून येतील. आंध्र प्रदेशात राहुल गांधींना कामगार आणि शेतकरी वर्गाचा चांगला पाठिंबा मिळाल्याचं दिसून आलं. 

लवकरच महाराष्ट्रात

 राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रात साधारणतः सहा नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. या यात्रेचा राज्यातील प्रवास नांदेड जिल्ह्यातील देलगूर तालुक्यातून होणार असल्याचे माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकTelanganaतेलंगणा