शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

राहुल गांधींची ४५ दिवसांत १,२१५ किमींची पायपीट, लवकरच महाराष्ट्रात पहिलं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 11:19 IST

केंद्रातील मोदी सरकारविरोधात देशातील सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करत राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील ११ राज्यांतून भारत जोडो यात्रा पूर्ण करण्याचा संकल्प केला असून आजमित्तीस ते कर्नाटकात यात्रा करत आहेत. कर्नाटकच्या रायचूरमधील येरागेरा गावातून आज पुन्हा त्यांची भारत जोडो यात्रा सुरु झाली असून आज कर्नाटकातील त्यांच्या यात्रेचं शेवटचं पाऊल असणार आहे. त्यानंतर, उद्या म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी ही यात्रा तेलंगणात पहिलं पाऊल ठेवेल आणि लवकरच महाराष्ट्रातूनही या यात्रेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या यात्रेला लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून दक्षिण भारतातही राहुल गांधींचं ठिकठिकाणी स्वागत झाल्याचं पाहायला मिळालं. 

केंद्रातील मोदी सरकारविरोधात देशातील सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करत राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे. ही यात्रा दिवाळीनंतर महाराष्ट्रात येणार आहे. या 'भारत जोडो यात्रे'त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेऊन निमंत्रण दिले होते, त्यांनी काँग्रेसचे हे निमंत्रण स्वीकारले आहे. 

कन्याकुमारी ते काश्मीर अशा एकूण ३५७० किमीचा प्रवास करणारी ही भारत जोडो यात्रा आहे. ७ सप्टेंबर रोजी राहुल गांधींनी या यात्रेला सुरुवात केली असून आत्तापर्यंत त्यांनी १२१५ किमीचा प्रवास पूर्ण केला आहे. कर्नाटकात आज यात्रेचं शेटवटचं पाऊल असून यापूर्वी तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यातून राहुल गांधींनी पायी प्रवास केला आहे. आता, तेलंगणात त्यांची एन्ट्री होणार असून त्यानंतर महाराष्ट्रात यात्रेचं पाऊल पडणार आहे. यात्रेचा आज ४५ वा दिवस आहे. 

तेलंगणातून या यात्रेचं महाराष्ट्रात आगमन होणार आहे. महाराष्ट्रात राहुल गांधींच्या स्वागतासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार हजर असणार आहेत. राहुल गांधींसमेवत ते व्यासपीठावरही दिसून येतील. आंध्र प्रदेशात राहुल गांधींना कामगार आणि शेतकरी वर्गाचा चांगला पाठिंबा मिळाल्याचं दिसून आलं. 

लवकरच महाराष्ट्रात

 राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रात साधारणतः सहा नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. या यात्रेचा राज्यातील प्रवास नांदेड जिल्ह्यातील देलगूर तालुक्यातून होणार असल्याचे माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकTelanganaतेलंगणा