शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

राहुल गांधी दोन मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक, काँग्रेसकडून अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 11:32 IST

राहुल गांधी यांच्या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसने आज अधिकृत घोषणा केली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. दरम्यान, राहुल गांधी यांच्या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसने आज अधिकृत घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसोबतच दक्षिण भारतातील केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. 

काँग्रेसकडून आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमधून याची अधिकृत घोषणा करण्यात आली. ''काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. ते केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवतील, हे सांगताना मला आनंद होत आहे.''असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटोनी यांनी सांगितले.

 तर केरळमधील वायनाड हा मतदारसंघ भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा मतदारसंघ केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू अशा तीन राज्यांना जोडतो. भाजपा सरकारच्या काळात दक्षिण भारतातील सांस्कृतिक ठेव्यावर घाला घालण्याचा प्रयत्न झाला आहे. उत्तर आणि दक्षिण भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नाते आहे. ते नाते दृढ करण्यासाठी राहुल गांधी दक्षिण भारतातून लढणार आहेत,'' असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. तसेच नरेंद्र मोदी 2014 मध्ये गुजरातबरोबरच वाराणसी येथून का निवडणूक लढले होते, असा सवालही सुजरेवाला यांनी यावेळी विचारला. 

 

केरळ काँग्रेस कमिटीने राहुल यांना वायनाडमधून निवडणूक लढविण्याची विनंती केली होती. लोकसभेची फेररचना झाल्यानंतर २००८ पासून वायनाड मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. या मतदार संघात कन्नूर, मलाप्पूरम आणि वायनाडचा समावेश असून २००८ पासून या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. 

 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे उत्तर प्रदेशमधील अमेठी या मतदारसंघामधून तीन वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारतात काँग्रेसला अधिक फायदा व्हावा यासाठी राहुल गांधी यांनी दक्षिण भारतातून लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात येत होती.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसamethi-pcअमेठीwayanad-pcवायनाड