शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

राहुल गांधी शुक्रवारपासून करणार निवडणुकीचा प्रचार, २८ ला पहिला टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 07:01 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी २३ ऑक्टोबरपासून प्रचारात असतील. सध्याच्या नियोजनानुसार ते ८-१० सभांत बोलतील. २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होईल. त्यात काँग्रेसच्या २१ उमेदवारांचे भवितव्य ठरेल.

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेते राहुल गांधी २३ ऑक्टोबरपासून प्रचारात असतील. सध्याच्या नियोजनानुसार ते ८-१० सभांत बोलतील. २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होईल.

शीलेश शर्मानवी दिल्ली :बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आपल्या आघाडीतील मित्रपक्षांसोबत उत्साहाने प्रचार करीत आहे कारण बिहारचे मतदार यावेळी बदल घडवतील, अशी त्याला खात्री आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी २३ ऑक्टोबरपासून प्रचारात असतील. सध्याच्या नियोजनानुसार ते ८-१० सभांत बोलतील. २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होईल. त्यात काँग्रेसच्या २१ उमेदवारांचे भवितव्य ठरेल. पक्षाचे वरिष्ठ नेते डॉ. शकील अहमद यांना वाटते की, पहिल्या टप्प्यातच काँग्रेस पुढे असेल. २१ पैकी किमान १५ उमेदवार जिंकून येतील.

दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ नोव्हेंबरला आहे. त्यात काँग्रेसचे २४ उमेदवार आहेत. त्यातील १६ जण निवडून येतील, असा पक्षाचा अंदाज आहे. शेवटच्या टप्प्याचे मतदान ७ नोव्हेंबरला असून त्या दिवशी काँग्रेसच्या २५ उमेदवारांचे भवितव्य ठरेल. या टप्प्यातही १६ उमेदवार जिंकतील, असे त्याला वाटते.

काँग्रेसच्या या आशेचा पाया हा नितीशकुमार सरकारचे अपयश आणि अमित शहा यांची चुकीची निवडणूक धोरणे आहेत. या परिस्थितीचा काँग्रेस आणि महा गठबंधन पूर्ण लाभ प्रचारात घेत आहेत. भाजपच्या दुहेरी राजकारणाचा व्यापक परिणाम होत असल्याचे ते लोकांना सांगत आहेत. काँग्रेस, डावेपक्ष आणि राजदच्या जोरदार प्रचाराने भाजप आणि नितीश घाबरले असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका राज्यसभा सदस्याने चर्चेत म्हटले की, लोजपसोबत भाजपने जो खेळ खेळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे भाजप आणि नितीशकुमार यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

मतदारांमध्ये मोठा संभ्रम -काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने म्हटले की, रामविलास पासवान यांच्या निधनानंतर भाजपने ज्या प्रकारे लोजपसोबत पडद्याआड गठबंधन केले त्यामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे नितीशकुमार भाजपच्या रणनीतीवरून साशंक आहेत. त्यांच्या शंकेचे मोठे कारण निवडणुकीनंतर भाजप आणि लोजपशी हात मिळवणी आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीBiharबिहारcongressकाँग्रेस