शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

राहुल गांधी शुक्रवारपासून करणार निवडणुकीचा प्रचार, २८ ला पहिला टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 07:01 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी २३ ऑक्टोबरपासून प्रचारात असतील. सध्याच्या नियोजनानुसार ते ८-१० सभांत बोलतील. २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होईल. त्यात काँग्रेसच्या २१ उमेदवारांचे भवितव्य ठरेल.

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेते राहुल गांधी २३ ऑक्टोबरपासून प्रचारात असतील. सध्याच्या नियोजनानुसार ते ८-१० सभांत बोलतील. २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होईल.

शीलेश शर्मानवी दिल्ली :बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आपल्या आघाडीतील मित्रपक्षांसोबत उत्साहाने प्रचार करीत आहे कारण बिहारचे मतदार यावेळी बदल घडवतील, अशी त्याला खात्री आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी २३ ऑक्टोबरपासून प्रचारात असतील. सध्याच्या नियोजनानुसार ते ८-१० सभांत बोलतील. २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होईल. त्यात काँग्रेसच्या २१ उमेदवारांचे भवितव्य ठरेल. पक्षाचे वरिष्ठ नेते डॉ. शकील अहमद यांना वाटते की, पहिल्या टप्प्यातच काँग्रेस पुढे असेल. २१ पैकी किमान १५ उमेदवार जिंकून येतील.

दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ नोव्हेंबरला आहे. त्यात काँग्रेसचे २४ उमेदवार आहेत. त्यातील १६ जण निवडून येतील, असा पक्षाचा अंदाज आहे. शेवटच्या टप्प्याचे मतदान ७ नोव्हेंबरला असून त्या दिवशी काँग्रेसच्या २५ उमेदवारांचे भवितव्य ठरेल. या टप्प्यातही १६ उमेदवार जिंकतील, असे त्याला वाटते.

काँग्रेसच्या या आशेचा पाया हा नितीशकुमार सरकारचे अपयश आणि अमित शहा यांची चुकीची निवडणूक धोरणे आहेत. या परिस्थितीचा काँग्रेस आणि महा गठबंधन पूर्ण लाभ प्रचारात घेत आहेत. भाजपच्या दुहेरी राजकारणाचा व्यापक परिणाम होत असल्याचे ते लोकांना सांगत आहेत. काँग्रेस, डावेपक्ष आणि राजदच्या जोरदार प्रचाराने भाजप आणि नितीश घाबरले असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका राज्यसभा सदस्याने चर्चेत म्हटले की, लोजपसोबत भाजपने जो खेळ खेळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे भाजप आणि नितीशकुमार यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

मतदारांमध्ये मोठा संभ्रम -काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने म्हटले की, रामविलास पासवान यांच्या निधनानंतर भाजपने ज्या प्रकारे लोजपसोबत पडद्याआड गठबंधन केले त्यामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे नितीशकुमार भाजपच्या रणनीतीवरून साशंक आहेत. त्यांच्या शंकेचे मोठे कारण निवडणुकीनंतर भाजप आणि लोजपशी हात मिळवणी आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीBiharबिहारcongressकाँग्रेस