शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

'26/11 हल्ल्याच्या वेळी राहुल गांधी नाच-गाणं करत होते'; मनीष तिवारींच्या पुस्तकावरुन भाजपचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 14:24 IST

''26/11 हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी परवानगी मागिती होती. पण, तत्कालीन काँग्रेस सरकारने ती परवानगी दिली नाही.''

नवी दिल्ली:काँग्रेस नेते मनीष तिवारी यांचे नवीन पुस्तक  '10 Flash Points; 20 Years - National Security Situations that Impacted India' यामध्ये त्यांनी मनमोहन सिंग सरकारवर मुंबईतील 26/11 च्या घटनेवरुन निशाणा साधला आहे. दरम्यान, भाजपनेही काँग्रेस, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर त्याच 26/11 च्या हल्ल्यावरुन टीका केली आहे.

काँग्रेसच्या अपयशाची कबुली-भाजपयाला काँग्रेसच्या अपयशाची कबुली म्हणणे योग्य ठरेल, असे मत भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते  म्हणाले, प्रत्येक भारतीयाप्रमाणे आम्हालाही खूप वेदना होत होत्या. तत्कालीन काँग्रेस सरकारला राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर भारताच्या अखंडतेची चिंता नव्हती. सोनिया-राहुल त्यांचे मौन तोडणार का? सोनिया गांधींना प्रश्न आहे की त्यांनी भारतीय सैन्याला खुले स्वातंत्र्य आणि परवानगी का दिली नाही? या प्रश्नाची उत्तरे जाणून घेणे देशासाठी महत्त्वाचे असल्याने भाजप हा प्रश्न उपस्थित करत आहे, असे ते म्हणाले. 

राहुल गांधी नाच-गाणं करत होतेते पुढे म्हणाले की, काँग्रेसने शहीदांच्या हौतात्म्याची खिल्ली उडवली. सोनिया गांधी तुम्हाला सांगावे लागेल की, लष्कराला तेव्हा परवानगी का दिली नाही ? आमच्या सैन्यावर तुमचा विश्वास नव्हता का? जेव्हा आपल्या देशावर हल्ला होत होता, तेव्हा राहुल गांधी सकाळपर्यंत नाच-गाणं करत होते, अशी बातमी एका वर्तमानपत्रात आली होती. काही दिवसांपूर्वी नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, इम्रान खान आमचे मोठे भाऊ आहेत. देश राहुल गांधींना विचारतोय की आमच्या पोलीस आणि कमांडोंनी दिलेल्या हौतात्म्याचा बदला पाकिस्तानकडून घेण्यात तुम्हाला यश का आले नाही ? पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने भारताची ताकद काय आहे हे दाखवून दिले आहे. उरीमध्ये पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला चपराक दिली होती, हे लक्षात ठेवा.

सैन्य मनमोहन सिंगांकडे परवानगी मागत राहिली-भाजप

ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आमचे लष्कर मनमोहन सिंग यांच्याकडे परवानगी मागत होते, पण काँग्रेसने परवानगी दिली नाही. असं काय झालं होतं, की सोनिया गांधींनी सैन्याला परवानगी दिली नाही ? पुलवामा हल्ल्यावर आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला. पाकिस्तानचे शेकडो सैनिक मारले. पण 26/11 च्या हल्ल्यानंतर काँग्रेसने लष्कराला परवानगी दिली नाही नाही, असा हल्लाबोल भाटिया यांनी केला.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी