शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

"सत्ताधाऱ्यांना संरक्षण मागावं लागल्याचे देशाने पाहिलं"; राहुल गांधींच्या विधानाचे राऊतांकडून समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 09:51 IST

Sanjay Raut : लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजपलं घेरलं होतं.

Parliament Session :संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान मोदींसह भाजपवर जोरदार निशाणा साधला. हिंदूंबाबत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यानं लोकसभेत मोठा गदारोळ झाला. भाजप देशात हिंसाचार, द्वेष आणि भीती पसरवल्याचा आरोप करत भाजपचे हे लोक हिंदू नाहीत असे वक्तव्य राहुल गांधींनी केले. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याने सत्ताधाऱ्यांनी आक्रमक होत त्यांचा विरोध सुरु केला. दुसरीकडे, संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या प्रकरणावरुन आता देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा संसदेत उतरवल्याची खोचक टीका केली आहे.

सोमवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षा आणि अग्निपथ भरती योजनेतील पेपर फुटल्याच्या आरोपावरून सरकारवर हल्लाबोल केला होता. याशिवाय भगवान शिवाचे चित्र दाखवताना फोटो दाखवत राहुल गांधी यांनी स्वतःला हिंदू म्हणवणारे लोक हिंसेची चर्चा करतात, तर भगवान शिव शांतीचा संदेश देतात, असे म्हटलं. राहुल गांधींच्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आक्षेप घेतला होता. राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली.

राहुल गांधी यांच्या विधानानंतर ठाकरे गटाचे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले की, "स्वतःला हिंदू म्हणवून घेणारे लोक संसदेतच बसले होते. त्यांचे कान स्वच्छ असते आणि त्यांनी ऐकले असते आणि त्यांना कळले असते की, राहुल गांधी यांनी एकटा भाजप हा हिंदू समाज नाही, असे म्हटले होते." 

एक गृहमंत्री आणि नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी भारी पडले - संजय राऊत

"भाजपच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा काल उतरवला. राहुल गांधी यांनी काल काय चुकीचे सांगितले. उद्धव ठाकरेंवर भाजप नेहमी आरोप करतो की त्यांनी हिंदुत्व सोडलं. तेव्हा उद्धव ठाकरे जे बोलतात तेच राहुल गांधी म्हणाले. आम्ही भाजला सोडलं हिंदुत्वाला सोडलं नाही असे उद्धव ठाकरे सांगतात. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. राहुल गांधींनी काल नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या तोंडावर सांगितले की हिंदुत्वाचा तु्म्ही ठेका घेतलेला नाही. हिंदुत्वाचा विचार तु्म्हाला कधी समजला नाही. नऊ मंत्री, एक गृहमंत्री आणि नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी काल भारी पडले. त्यांना वारंवार हस्तक्षेप करावा लागला. आपली बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे संरक्षण मागावे लागले. कालचे चित्र फार विचलित करणारे होते. १० वर्षात पहिल्यांदाच देशाच्या मजबूत गृहमंत्र्यांना संसदेत ओम बिर्ला यांच्याकडे संरक्षण मागावे लागले. कालपर्यंत आम्हाला यांच्यापासून संरक्षण मागावं लागत होतं. एवढी यांचा हुकुमशाही होती. पण राहुल गांधीनी त्यांना संसदेत गुढघ्यावर आणलं आणि त्यांना ओम बिर्लांकडे संरक्षण मागावं लागल्याचे चित्र देशाने पाहिलं. प्रामाणिक विरोधी पक्षनेता काय असतो हे दिसलं. ही सुरुवात आहे," असे संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीSanjay Rautसंजय राऊत