शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

व्यवस्था, अर्थव्यवस्था दोन्ही मोडकळीस; गुजरातमधील पलायनावरुन राहुल गांधीचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 22:06 IST

गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतीय लक्ष्य

नवी दिल्ली: गुजरातमध्ये बलात्काराच्या घटनेनंतर स्थानिकांनी उत्तर भारतायींना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे मूळचे उत्तर प्रदेश आणि बिहारचे असणारे शेकडो लोक गुजरातमधून पलायन करत आहेत. उत्तर भारतीयांवर गुजरातमध्ये हल्ले सुरू आहेत. यावरुन राजकारणदेखील पेटलं आहे. यासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या घटनेवरुन सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केलं आहे. व्यवस्था आणि अर्थव्यवस्था दोन्ही मोडकळीस आल्याचं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. गुजरातमधून होणाऱ्या पलायनावरुन काँग्रेसमधील कोणत्याही मोठ्या नेत्यानं अद्याप प्रतिक्रिया दिलेली नव्हती. या प्रकरणावर आता राहुल गांधींनी भाष्य केलं आहे. 'गरिबी हीच सर्वात मोठी दहशत आहे. बंद पडलेले कारखाने आणि त्यामुळे गेलेला रोजगार हेच गुजरातमध्ये सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचं मूळ आहे. व्यवस्था आणि अर्थव्यवस्था दोन्हींची स्थिती गंभीर आहे. कष्टकऱ्यांना लक्ष्य करणं पूर्णपणे चुकीचं आहे. मी याच्या विरोधात आहे,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. गुजरातमधून उत्तर भारतात परतण्यासाठी बसमध्ये चढणाऱ्या लोकांचा फोटोदेखील राहुल यांनी ट्विट केला आहे. राहुल गांधी यांच्या आधी समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करत गुजरातमध्ये घडत असलेल्या घटनांचा निषेध केला होता. या पलायनासाठी राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. गुजरातमधील पलायन सुरुच असल्यानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याशी संवाद साधला. गुजरातमध्ये वास्तव्यास असलेल्या उत्तर भारतीयांनी राज्य सरकारवर विश्वास ठेवावा, असं आवाहन आदित्यनाथ यांनी केलं.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujaratगुजरातcongressकाँग्रेसBJPभाजपा