शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

व्यवस्था, अर्थव्यवस्था दोन्ही मोडकळीस; गुजरातमधील पलायनावरुन राहुल गांधीचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 22:06 IST

गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतीय लक्ष्य

नवी दिल्ली: गुजरातमध्ये बलात्काराच्या घटनेनंतर स्थानिकांनी उत्तर भारतायींना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे मूळचे उत्तर प्रदेश आणि बिहारचे असणारे शेकडो लोक गुजरातमधून पलायन करत आहेत. उत्तर भारतीयांवर गुजरातमध्ये हल्ले सुरू आहेत. यावरुन राजकारणदेखील पेटलं आहे. यासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या घटनेवरुन सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केलं आहे. व्यवस्था आणि अर्थव्यवस्था दोन्ही मोडकळीस आल्याचं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. गुजरातमधून होणाऱ्या पलायनावरुन काँग्रेसमधील कोणत्याही मोठ्या नेत्यानं अद्याप प्रतिक्रिया दिलेली नव्हती. या प्रकरणावर आता राहुल गांधींनी भाष्य केलं आहे. 'गरिबी हीच सर्वात मोठी दहशत आहे. बंद पडलेले कारखाने आणि त्यामुळे गेलेला रोजगार हेच गुजरातमध्ये सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचं मूळ आहे. व्यवस्था आणि अर्थव्यवस्था दोन्हींची स्थिती गंभीर आहे. कष्टकऱ्यांना लक्ष्य करणं पूर्णपणे चुकीचं आहे. मी याच्या विरोधात आहे,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. गुजरातमधून उत्तर भारतात परतण्यासाठी बसमध्ये चढणाऱ्या लोकांचा फोटोदेखील राहुल यांनी ट्विट केला आहे. राहुल गांधी यांच्या आधी समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करत गुजरातमध्ये घडत असलेल्या घटनांचा निषेध केला होता. या पलायनासाठी राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. गुजरातमधील पलायन सुरुच असल्यानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याशी संवाद साधला. गुजरातमध्ये वास्तव्यास असलेल्या उत्तर भारतीयांनी राज्य सरकारवर विश्वास ठेवावा, असं आवाहन आदित्यनाथ यांनी केलं.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujaratगुजरातcongressकाँग्रेसBJPभाजपा