शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

व्यवस्था, अर्थव्यवस्था दोन्ही मोडकळीस; गुजरातमधील पलायनावरुन राहुल गांधीचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 22:06 IST

गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतीय लक्ष्य

नवी दिल्ली: गुजरातमध्ये बलात्काराच्या घटनेनंतर स्थानिकांनी उत्तर भारतायींना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे मूळचे उत्तर प्रदेश आणि बिहारचे असणारे शेकडो लोक गुजरातमधून पलायन करत आहेत. उत्तर भारतीयांवर गुजरातमध्ये हल्ले सुरू आहेत. यावरुन राजकारणदेखील पेटलं आहे. यासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या घटनेवरुन सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केलं आहे. व्यवस्था आणि अर्थव्यवस्था दोन्ही मोडकळीस आल्याचं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. गुजरातमधून होणाऱ्या पलायनावरुन काँग्रेसमधील कोणत्याही मोठ्या नेत्यानं अद्याप प्रतिक्रिया दिलेली नव्हती. या प्रकरणावर आता राहुल गांधींनी भाष्य केलं आहे. 'गरिबी हीच सर्वात मोठी दहशत आहे. बंद पडलेले कारखाने आणि त्यामुळे गेलेला रोजगार हेच गुजरातमध्ये सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचं मूळ आहे. व्यवस्था आणि अर्थव्यवस्था दोन्हींची स्थिती गंभीर आहे. कष्टकऱ्यांना लक्ष्य करणं पूर्णपणे चुकीचं आहे. मी याच्या विरोधात आहे,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. गुजरातमधून उत्तर भारतात परतण्यासाठी बसमध्ये चढणाऱ्या लोकांचा फोटोदेखील राहुल यांनी ट्विट केला आहे. राहुल गांधी यांच्या आधी समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करत गुजरातमध्ये घडत असलेल्या घटनांचा निषेध केला होता. या पलायनासाठी राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. गुजरातमधील पलायन सुरुच असल्यानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याशी संवाद साधला. गुजरातमध्ये वास्तव्यास असलेल्या उत्तर भारतीयांनी राज्य सरकारवर विश्वास ठेवावा, असं आवाहन आदित्यनाथ यांनी केलं.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujaratगुजरातcongressकाँग्रेसBJPभाजपा