शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायास कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
3
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
4
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
5
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
6
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
7
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
8
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
9
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
10
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
11
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
12
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
13
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
14
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
15
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
16
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
17
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
18
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
19
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
20
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?

लोकसभेनंतर राहुल गांधींना अटक करणार; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 08:45 IST

 दरम्यान, सुरक्षेच्या समस्यांबद्दल गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी केली. 

बारपेटा/गुवाहाटी (आसाम) : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला असून, राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीनंतर अटक केली जाईल, असा इशारा सरमा यांनी दिला आहे, तर शक्य तेवढे गुन्हे दाखल करा, घाबरणार नाही, असे आव्हान राहुल गांधी यांनी सरमा यांना दिले आहे. ‘शक्य तेवढे गुन्हे दाखल करा, त्याला घाबरणार नाही,’ असे आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी भाजपशासित राज्य सरकारला दिले. 

‘मला कळत नाही की, हिमंता बिस्वा सरमा यांना माझ्यावर गुन्हे दाखल करून मला धमकावता येईल, अशी कल्पना कशी आली? तुम्ही जितके खटले दाखल करू शकता, तितके दाखल करा. आणखी २५ खटले दाखल करा, मी घाबरणार नाही. भाजप-आरएसएस मला धमकावू शकत नाही,’ असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, सुरक्षेच्या समस्यांबद्दल गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी केली. 

‘रोड शो’ला प्रचंडी गर्दीशहराच्या मुख्य रस्त्यांवरून हळूहळू फिरणाऱ्या वाहनाच्या छतावर बसून राहुल गांधी नागरिकांना अभिवादन करत होते. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.  गांधींनी त्यांच्या वाहनावरील सहभागींच्या मुलांशी संवाद साधला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसAssamआसाम