शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Rahul Gandhi : 'ते सत्तेसाठी काहीही करतील, आम्ही सत्याने लढू आणि जिंकू...' राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 15:29 IST

Rahul Gandhi : ‘RSS-BJP सत्ताग्रही; मोदी-अदानी एकच…सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतंय.’

Rahul Gandhi : काँग्रेसचे रायपूर अधिवेशन आज संपत आहे. शेवटच्या दिवशी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले भाषण केले. यावेळी त्यांनी देशातील परिस्थिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गौतम अदानी प्रकरणावर भाष्य केले. जोपर्यंत अदानीचं सत्य समोर येत नाही, तोपर्यंत आम्ही प्रश्न विचारत राहू, असं ते म्हणाले. त्यांनी भाजप-आरएसएसला 'सत्ताग्रही' म्हटले तर आम्ही 'सत्याग्रही' असल्याचे सांगितले. 

राहुल गांधी म्हणाले, 'मी संसदेत एका उद्योगपतीवर हल्ला केला. मी फक्त एकच प्रश्न विचारला, मोदीजी, तुमचा अदानीजींशी काय संबंध? संपूर्ण भाजप सरकारने अदानींना संरक्षण देण्यास सुरुवात केली. अदानीजींवर हल्ला करणारा देशद्रोही आहे...अदानी आणि मोदीजी एकच आहेत. आम्ही एकदा नाही तर हजार वेळा प्रश्न विचारू, जोपर्यंत अदानींचे सत्य समोर येत नाही, तोपर्यंत आम्ही प्रश्न विचारत राहू,' असं राहुल म्हणाले.

'अदानी समुहाविरुद्धच्या तपासाबाबत मी समाधानी नाही. संरक्षण क्षेत्रातील शेल कंपन्यांची चौकशी होत नाहीये. पंतप्रधान त्यावर काहीच बोलले नाहीत, यावरुन पंतप्रधान त्यांना संरक्षण देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.' भारत जोडो यात्रेचा आणि काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याचा संदर्भ देत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, 'नरेंद्र मोदींनी भाजपच्या 15-20 जणांसह श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावला, तर आम्ही काश्मीरमधील लाखो तरुणांच्या माध्यमातून तिरंगा फडकावला,' असंही राहुल म्हणाले.

ते पुढे म्हणतात, 'एका मंत्र्याने मुलाखतीत सांगितले की, चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठी आहे. मग आपण त्यांच्याशी कसे लढू शकतो? इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले तेव्हा त्यांची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा लहान होती का? म्हणजेच जे तुमच्यापेक्षा बलवान आहेत त्यांच्याशी भांडू नका. याला भ्याडपणा म्हणतात. आपल्यापेक्षा दुबळ्या व्यक्तीशी लढणे याला भ्याडपणा म्हणतात, हा राष्ट्रवाद नाही', अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस