शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

'...तर कितीही मोठा नेता असला तरी पक्षातून हकालपट्टी करुन टाकू', राहुल गांधींनी काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांना दिला इशारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 07:58 IST

तेलंगणामध्ये पुढील वर्षात विधानसभा निवडणूक होणार आहे. सर्व राजकीय पक्ष मात्र आतापासूनच तयारीला लागले आहेत. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी देखील पक्ष बांधणी आणि प्रचाराच्या तयारीला लागले आहेत.

लखनौ-

तेलंगणामध्ये पुढील वर्षात विधानसभा निवडणूक होणार आहे. सर्व राजकीय पक्ष मात्र आतापासूनच तयारीला लागले आहेत. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी देखील पक्ष बांधणी आणि प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. नुकतंच राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मोठ्या रॅलीला संबोधित केलं. याच रॅलीमध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर करुन टाकलं आणि कोणत्याही परिस्थितीत टीआरएससोबत हातमिळवणी करणार नाही असंही स्पष्ट केलं आहे. 

राहुल गांधी यांनी टीआरएससोबतच्या हातमिळवणीबाबतचे कोणतेही प्रयत्न आणि चर्चा करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनाही स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. "काँग्रेसमधील माझ्या सहकाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की ज्या व्यक्तीनं तेलंगणाला धोका दिलाय. ज्यानं इथं चोरी केली आणि राज्याच्या स्वप्नांची माती केली अशा व्यक्तींसोबत काँग्रेस कधीच हातमिळवणी करणार नाही. तसंच हा प्रश्न आता यापुढे कोणत्याही काँग्रेस नेत्यानं उपस्थित केला. तर त्या काँग्रेस नेत्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. मग तो कुणीही असो, कितीही मोठा नेता असो. आम्ही त्यांना पक्षातून बाहेर काढू", असा रोखठोक इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. 

टीआरएससोबत इतर कोणत्याही पक्षानं हातमिळवणी करू नये असंही राहुल गांधी यांनी आवाहन यावेळी केलं. तेलंगणामध्ये भाजपच चंद्रशेखर राव यांना समर्थन देत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. "मी याआधीही सांगितलंय की ज्या काँग्रेस नेत्याला असं वाटतं की टीआरएससोबत युती व्हावी अशा नेत्यानं भाजपा किंवा टीआरएसमध्ये जावं. कारण जर युती जर आहे तर ती भाजपा आणि टीआरएसमध्ये झालेली आहे. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी कायदे लागू केले होते तेव्हा टीआरएस नेते काय म्हणत होते हे लक्षात आहे ना?", असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. 

केंद्रात भाजपाचं सरकार आहे आणि त्यांचा टीआरएसला पाठिंबा आहे. त्यामुळे तेलंगणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊ शकतो. मुख्यमंत्री काहीही करू शकतात. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सीबीआय, ईडीची कारवाई होणार नाही, असाही टोला राहुल गांधी यांनी यावेळी लगावला. तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार येताच शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल, असं आश्वासन देतानाच छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण केली आहेत याचाही दाखला राहुल गांधी यावेळी दिला. छत्तीसगडमध्ये शेतमालाला चांगला भाव मिळाला आणि शेतकऱ्यांचं कर्ज देखील माफ केलं असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसTelanganaतेलंगणा