शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

अमेठीत कोंडी करण्याचे भाजपचे डावपेच राहुल गांधींनी उधळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 06:00 IST

अमेठीत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या स्मृती इराणी लढत आहेत.

- हरिश गुप्ताअमेठी : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीमध्ये पराभव व्हावा म्हणून भाजपने जंगजंग पछाडले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ व पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या प्रचारसभा या मतदारसंघात झाल्या. पण भाजपच्या या डावपेचांवर मात करण्यात राहुल गांधी यशस्वी झाले आहेत.अमेठीत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या स्मृती इराणी लढत आहेत. इराणी यांना उत्तर प्रदेशच्या सरकारी यंत्रणेचेही मोठे पाठबळ लाभले आहे. भाजपव्यतिरिक्त इतर पक्षांच्या लखनौऊ वा अन्य राज्यांतून आलेल्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे.‘चौकीदार चोर है' असा घणाघात राहुल गांधी यांनी केल्यामुळे त्यांच्यावर नरेंद्र मोदी संतापले आहेत. या प्रचारामुळे भाजप चिंताग्रस्तही झाला आहे. गुजरात विधानसभेत काँग्रेसला सत्ता मिळता मिळता राहिली. मध्य प्रदेश, राजस्थान, विधानसभेत काँग्रेसने भाजपचा पराभव केला. राहुल यांनी कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण केला तर प्रियांका यांनीही प्रचारात चैतन्यही आणले.अमेठीबरोबरच राहुल यांनी केरळच्या वायनाडमधूनही अर्ज भरुन त्यांना हरविण्याचे भाजपचे डावपेच उधळून लावले. प्रियांका यांनी अमेठीत पाच दिवसांच्या दौरा करून मोदी सरकारवर कडक टीका केली. राहुल यांनीही अमेठीचा पाच दिवसांचा दौरा केला. याआधी गांधी घराण्यातील कोणाही व्यक्तीने निवडणूक काळात एकाच मतदारसंघात इतक्या दिवसांचा दौरा केला नव्हता.

मोदींकडून विद्वेषी प्रचार - राहुल गांधीनवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अजय माकन उभे असून तेथील मतदानकेंद्रात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी मतदान केले. राहुल गांधी यांनी मतदानानंतर केलेल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, लोकशाही वाचविण्यासाठी आमचा संघर्ष सुरू असून त्यादृष्टीने या लोकसभा निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. देशहित लक्षात घेऊनच मी आज मतदान केले आहे. बेरोजगारी, शेतीचे गंभीर बनलेले प्रश्न, नोटाबंदी, राफेल खरेदी व्यवहारातील घोटाळा या प्रश्नांवर विरोधकांनी आवाज उठविला आहे. मोदींनी मात्र विद्वेषी प्रचार चालविला आहे. आम्ही मात्र मत्सरावर प्रेमानेच मात करू.

अखिलेश यांचे आवाहन : राहुल गांधी यांनाच मतदान करा असे आव्हान करण्याची विनंती काँग्रेसतर्फे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना करण्यात आली होती. अमेठी व रायबरेलीमध्ये काँग्रेस उमेदवारालाच मतदान करावे असा आदेश मायावतींनी बसपच्या कार्यकर्त्यांना दिला होता. याबद्दल या दोन्ही नेत्यांचे राहुल गांधी यांनी आभार मानल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :amethi-pcअमेठीRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019