शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

Rahul Gandhi : "भाजपा लोकांची दिशाभूल करत आहे, द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान उघडायचं असेल तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 17:04 IST

Rahul Gandhi : जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. 

काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा शनिवारी उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथून सुरू झाला. या यात्रेत आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधी सहभागी झाल्या होत्या. मुरादाबादमध्ये लोकांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांचं जंगी स्वागत केलं आहे. यात्रेदरम्यान जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली. 

यात्रेदरम्यान लोकांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, "बंधू आणि भगिनींनो, इकडे बघा, तिकडे बघा, पंतप्रधान मोदी हेच करतात. लोकांची दिशाभूल करतात. ही भाजपाची सिस्टम आहे, एक माणूस बॉलिवूड ते सर्जिकल स्ट्राईकपर्यंत बोलून तुमचे लक्ष दुसरीकडे नेईल. या देशात 50% मागासलेले लोक, 15% अल्पसंख्याक, 15% दलित आणि 8% आदिवासी आहेत. या 90% लोकांचा या देशात किती सहभाग आहे हे मला तुम्हाला विचारायचं आहे. ते तुम्हाला मनरेगाच्या यादीत दिसतील, पण मोठमोठ्या कंपन्या, उच्च न्यायालये, मीडियामध्ये दिसत नाहीत."

राहुल यांनी मोदींवर निशाणा साधत पुढे म्हटलं की, "पंतप्रधान मोदी म्हणतात, 'हिंदुस्थान सर्वांचा', जेव्हा 90% लोकांचा सहभाग नाही, तर हा सर्वांचा हिंदुस्थान कसा? मी तुझ्यासोबत 4000 किलोमीटर चाललो. द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडायचे असेल तर पहिलं काम द्वेष नष्ट करणं ही या यात्रेची घोषणा आहे. देशभक्ती देशाला जोडते, तोडत नाही. हा माझा तुमच्यासाठी मेसेज आहे. इथे आल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो."

भारत जोडो न्याय यात्रेत पहिल्यांदाच दिसल्या प्रियंका गांधी, म्हणाल्या...

भारत जोडो यात्रेला संबोधित करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, मुरादाबादमध्ये आल्याचा आनंद आहे. प्रियंका यांनी लोकांना प्रश्न विचारत म्हटलं की, दोन वर्षांत इथे काय बदललं?. समस्या सुटल्या की नाही? आज पेपर लीक झाले आहेत, तरुण बेरोजगार आहेत.यासोबतच प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या की, सरकार सातत्याने अत्याचार करत असून बेरोजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र त्यांचं कोणीही ऐकत नाही. गोरगरिबांच्या घरावर बुलडोझर चालला असून शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यूपीमधील मुरादाबाद येथून या यात्रेत सामील झाल्या आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारणPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपा