शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi, Hanuman Mandir: राहुल गांधी 'मरघट वाले हनुमानजीं'च्या मंदिरात, रामायण काळाशी आहे खास 'कनेक्शन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 20:45 IST

या मंदिरात राहुल गांधींनी हनुमान चालिसा पठणही केले

Rahul Gandhi, Hanuman Mandir: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' ९ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झाली आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) दिल्लीच्या काश्मीर गेट येथे असलेल्या मरघटच्या हनुमान मंदिरात पोहोचले. दर्शन, पूजा व हनुमान चालिसाचे पठण करून येथून प्रवासाला सुरुवात करण्यात आली. मरघट हनुमानजी मंदिराशी गांधी परिवाराचा जुना संबंध असून या मंदिरावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. १९७३ मध्ये इंदिरा गांधी पहिल्यांदा मरघटच्या हनुमानजींच्या मंदिरात पोहोचल्या होत्या. पुढेही राहुल यांचे वडील राजीव गांधी आणि त्यांचे काका संजय गांधीही येथे येत असत. जाणून घेऊया या मंदिराबाबत काही रोमांचक गोष्टी-

मंदिराला नाव कसे पडले?

मरघटचे हनुमान मंदिर (मरघट वाले बाबा मंदिर) काश्मिरी गेटच्या जमुना बाजार परिसरात आहे. अनेक लोक या मंदिराला 'मरघट वाले बाबा' या नावानेही ओळखतात. एकेकाळी या मंदिराच्या उजव्या तीरावरून यमुना नदी वाहत होती, पण हळूहळू यमुनेचे पाणी कमी होत गेले आणि नदी मंदिरापासून दूर गेली. आजही यमुनेला पूर आला तर अनेक वेळा यमुनेचे पाणी मंदिराच्या दरवाज्यापर्यंत येते. मरघट हनुमानजींच्या मंदिरातील बजरंगबलीची मूर्ती जमिनीपासून सुमारे 8 फूट खाली आहे. मरघट हनुमानजींच्या मंदिरासमोर स्मशानभूमी आहे. तिथे आजही मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. हे स्मशान रामायण काळातील असल्याचे सांगितले जाते. स्मशानभूमीमुळेच या मंदिराला 'मरघट वाले हनुमानजी का मंदिर' असे नाव पडल्याचे सांगितले जाते.

मंदिराविषयी काय श्रद्धा?

मरघट हनुमानजींच्या मंदिराबाबत अनेक प्राचीन आणि पौराणिक समजुती आहेत. मंदिराच्या पुजाऱ्यांचा दावा आहे की हनुमानजी स्वतः येथे प्रकट झाले होते. सर्वात पौराणिक आणि प्राचीन दावा रामायण आणि महाभारत काळाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. मरघट वाले हनुमानजी मंदिर हे महाभारत काळात पांडवांनी बांधलेल्या पाच मंदिरांपैकी एक असल्याचे म्हटले जाते.

रामायण काळाशीही संबंध असल्याचा दावा

आणखी एक पौराणिक मान्यता अशी आहे की राम-रावण युद्धादरम्यान बंधू लक्ष्मण बेशुद्ध झाल्यावर पवनपुत्र हनुमान संजीवनी वनस्पती घेण्यासाठी या मार्गानेच गेले. त्यांनी इथेच थांबून विश्रांती घेतली आणि हळूहळू या मंदिराची किर्ती वाढत गेली. दर मंगळवार व शनिवारी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात. राजकारण्यांपासून ते चित्रपटसृष्टीतील व्यक्तीही येथे येतात.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राramayanरामायणHanuman Jayantiहनुमान जयंती