शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi, Hanuman Mandir: राहुल गांधी 'मरघट वाले हनुमानजीं'च्या मंदिरात, रामायण काळाशी आहे खास 'कनेक्शन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 20:45 IST

या मंदिरात राहुल गांधींनी हनुमान चालिसा पठणही केले

Rahul Gandhi, Hanuman Mandir: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' ९ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झाली आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) दिल्लीच्या काश्मीर गेट येथे असलेल्या मरघटच्या हनुमान मंदिरात पोहोचले. दर्शन, पूजा व हनुमान चालिसाचे पठण करून येथून प्रवासाला सुरुवात करण्यात आली. मरघट हनुमानजी मंदिराशी गांधी परिवाराचा जुना संबंध असून या मंदिरावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. १९७३ मध्ये इंदिरा गांधी पहिल्यांदा मरघटच्या हनुमानजींच्या मंदिरात पोहोचल्या होत्या. पुढेही राहुल यांचे वडील राजीव गांधी आणि त्यांचे काका संजय गांधीही येथे येत असत. जाणून घेऊया या मंदिराबाबत काही रोमांचक गोष्टी-

मंदिराला नाव कसे पडले?

मरघटचे हनुमान मंदिर (मरघट वाले बाबा मंदिर) काश्मिरी गेटच्या जमुना बाजार परिसरात आहे. अनेक लोक या मंदिराला 'मरघट वाले बाबा' या नावानेही ओळखतात. एकेकाळी या मंदिराच्या उजव्या तीरावरून यमुना नदी वाहत होती, पण हळूहळू यमुनेचे पाणी कमी होत गेले आणि नदी मंदिरापासून दूर गेली. आजही यमुनेला पूर आला तर अनेक वेळा यमुनेचे पाणी मंदिराच्या दरवाज्यापर्यंत येते. मरघट हनुमानजींच्या मंदिरातील बजरंगबलीची मूर्ती जमिनीपासून सुमारे 8 फूट खाली आहे. मरघट हनुमानजींच्या मंदिरासमोर स्मशानभूमी आहे. तिथे आजही मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. हे स्मशान रामायण काळातील असल्याचे सांगितले जाते. स्मशानभूमीमुळेच या मंदिराला 'मरघट वाले हनुमानजी का मंदिर' असे नाव पडल्याचे सांगितले जाते.

मंदिराविषयी काय श्रद्धा?

मरघट हनुमानजींच्या मंदिराबाबत अनेक प्राचीन आणि पौराणिक समजुती आहेत. मंदिराच्या पुजाऱ्यांचा दावा आहे की हनुमानजी स्वतः येथे प्रकट झाले होते. सर्वात पौराणिक आणि प्राचीन दावा रामायण आणि महाभारत काळाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. मरघट वाले हनुमानजी मंदिर हे महाभारत काळात पांडवांनी बांधलेल्या पाच मंदिरांपैकी एक असल्याचे म्हटले जाते.

रामायण काळाशीही संबंध असल्याचा दावा

आणखी एक पौराणिक मान्यता अशी आहे की राम-रावण युद्धादरम्यान बंधू लक्ष्मण बेशुद्ध झाल्यावर पवनपुत्र हनुमान संजीवनी वनस्पती घेण्यासाठी या मार्गानेच गेले. त्यांनी इथेच थांबून विश्रांती घेतली आणि हळूहळू या मंदिराची किर्ती वाढत गेली. दर मंगळवार व शनिवारी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात. राजकारण्यांपासून ते चित्रपटसृष्टीतील व्यक्तीही येथे येतात.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राramayanरामायणHanuman Jayantiहनुमान जयंती