शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

Rahul gandhi : 'शिवसेनेचं 100 टक्के खरंय, राहुल गांधींना PM पदाचे उमेदवार घोषित करावं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 16:59 IST

Rahul gandhi : आगामी काळात पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आक्रमक होताना दिसत आहे.

ठळक मुद्देशिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधील 'रोखठोक' या सदरातून खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामध्ये राऊत यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची तुलना पुन्हा एकदा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे.

मुंबई - देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला अद्यपही कायमस्वरुपी अध्यक्ष मिळालेला नाही. तसेच, काँग्रेसकडून 2024 च्या निवडणुकांसाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून कुठलाही चेहरा दिला नाही. त्यामुळे, काँग्रेसच्या राजकीय रणनितीबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. त्यातूनच, प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनाही पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जाते. यावरुनच, आता बॉलिवूड अभिनेता केआरकेनं शिवसेनेच्या मताशी सहमती दर्शवली आहे.

आगामी काळात पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आक्रमक होताना दिसत आहे. त्यातच, सन २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील चेहरा कोण असेल यावर विरोधी पक्षांचं अद्याप एकमत होताना दिसत नाही. पण शिवसेनेनं राहुल गांधी यांच्याच नावाला पसंती दर्शवली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची दावेदारी नाकारताना शिवसेनेनं तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या पक्षांना खेळ बिघडवणारे पक्ष म्हणून टीका केली आहे. अभिनेता केआरके यांनीही शिवसेनेची री ओढली असून शिवसेनेच्या मताशी 100 टक्के सहमत असल्याचं केआरकेनं म्हटलं आहे. विरोधी पक्षांनी राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करायला हवं. भारताचे पंतप्रधान बनण्यासाठी ममता बॅनर्जींसारख्या प्रादेशिक पक्षाचे नेते पुरेसे नाहीत, असे केआरके यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.

राहुल गांधी हेच भाजपला रोखणारे नेते

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधील 'रोखठोक' या सदरातून खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामध्ये राऊत यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची तुलना पुन्हा एकदा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे. लखीमपूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न त्यांनी हाणून पाडला तसेच त्यांच्या कार्यपद्धतीत इंदिरा गांधी यांची झलक दिसते असंही राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे एकमेव असे नेते आहेत जे दिल्लीतील भाजप सरकारला मजबूत पर्याय ठरु शकतात, असा दावाही त्यांनी केला आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधीbollywoodबॉलिवूडMamata Banerjeeममता बॅनर्जी